हिंगोली (वृत्तसंस्था) लग्नाच्या अवघ्या आठ दिवसानंतर एका २६ वर्षीय तरुणाने आत्महत्या (Suicide) केल्याची हृदयद्रावक घटना हिंगोलीत (Hingoli) घडली आहे. आकाश भानुदास कुटे (वय २६) असं मयत तरुणाचं नाव आहे.
आकाशचा आठ दिवसांपूर्वी विवाह झाला होता. शहरातील महादेव वाडी येथील तरुणीशी त्याचे लग्न मोठ्या धूमधडाक्यात झाले होते. परंतु लग्न झाल्यानंतर आठ दिवसानंतर आकाशने असलेल्या वंजारवाडी शिवराममधील शेतात असलेल्या आखाड्यावर एका लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. आकाशने आत्महत्येसारखे धक्कादायक पाऊल उचलल्यामुळे कुटुंबियांना मानसिक धक्का बसला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी आकाशने कोणतीही सुसाइड नोट लिहिली नाही. त्यामुळे आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट आहे. मयत आकाशच्या पश्चात आई, एक भाऊ, पत्नी आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.