बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील कुऱ्हा हरदो ,धोंडखेडा, लोणवडी परिसरात दि. २१ रोजी रात्री आणि २२ सकाळपर्यंत अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अतिवृष्टीमुळे या सर्व गावांमध्ये मका, कपाशी या खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सहा जुलै रोजी सुद्धा याच परिसरात अतिवृष्टीमुळे शेतीसह घरांचे नुकसान झाले होते. पुन्हा झालेल्या या नुकसानीमुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. प्रभारी तहसीलदार मयूर कळसे यांनी सकाळी या गावात पाहणी करून पुढील पंचनामे करण्यासाठी तलाठी यांना सूचना दिल्या आहेत.
या सर्व गावातील नुकसानग्रस्त भागाची आमदार चंद्रकांत पाटील पाहणी केली व प्रशासनाला पंचनामाचे लवकर करून अहवाल करण्याच्या सूचना दिल्यात. आमदार पाटील यांच्या समवेत तालुक्यातील पदाधिकारी होते. तसेच या गावात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खेवलकर यांनी सुद्धा भेट दिली.