मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२ टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी ९५.३५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
या वेळी ६,५३,२७६ मुलींनी परीक्षा दिली होती त्यातून ६,२२,९०५ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण ९३.२९ टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा २.०६ टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल ९४.२२ ९४.२२टक्के इतका लागला आहे. फेब्रुवारी – मार्च २०२० च्या तुलनेत हा निकाल एकूण ३.५६ टक्क्यांनी वाढला आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १४ लाख ४९ हजार ६६४ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी १३ लाख ५६ हजार ६०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
परीक्षेला नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी – १४, ४९,६६४
एकूण परीक्षा दिलेले विद्यार्थी – १४,३९,७३१
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी – १३,५६,६०४
एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी – ९३.२९
एकूण उत्तीर्ण विद्यार्थिनींची टक्केवारी – ९५.३५
निकालाची वैशिष्ट्ये
सर्वाधिक निकाल कोकण विभाग – ९७.२१ टक्के
सर्वात कमी निकाल मुंबई विभाग – ९०.९१ टक्के
व्यवसाय अभ्यासक्रमांचा निकाल ९८.८० टक्के
दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल – ९५.२४ टक्के
शाखानिहाय निकाल
विज्ञान शाखा – ९८.३०टक्के
वाणिज्य शाखा – ९०.५१ टक्के
कला शाखा – ९१.७१ टक्के
व्यवसाय अभ्यासक्रम – ९२.४० टक्के
विभागनिहाय टक्केवारी
कोकण – ९७.२१टक्के
पुणे- ९३.६१टक्के
नागपूर – ९६.५२ टक्के
औरंगाबाद – ९४.९७टक्के
मुंबई- ९०.९१टक्के
कोल्हापूर -९५.०७टक्के
अमरावती – ९६.३४ टक्के
नाशिक – ९५.२५ टक्के
लातूर – ९५.२५ टक्के