मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात सध्या १२ वी बोर्डाच्या (HSC Exam) वार्षिक परीक्षा सुरु आहेत. काल इग्रजी या विषयाचा पेपर होता. या पेपरमध्ये १ मार्कसाठी एक प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, तो प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आला असल्याची माहिती समोर आली असून, या चुकीच्या विचारण्यात आलेल्या प्रश्नासाठी आता एक गुण विध्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
बारावी बोर्ड परीक्षेला कालपासून सुरुवात झाली आहे. राज्यातील ९ हजार ६३५ परीक्षा केंद्रावर १४ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. दरम्यान काल बारावीची परीक्षेत इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये १ गुणांचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आला होता. त्या एका प्रश्नाचा १ गुण विद्यार्थ्यांना मिळणार असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
काल बारावी इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये १ गुणांचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आला होता. याबाबतच्या तक्रारी अनेक विद्यार्थ्यांनी बोर्डासमोर मांडल्या. बोर्ड अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीनंतर ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक 1) A) 5 हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांना बोर्डाकडून एक गुण अधिकचा दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. इंग्रजी पेपर मध्ये बोर्डाकडून चूक झालेल्या आणि विद्यार्थ्यांने सोडवलेल्या एका प्रश्नाचा १ मार्क विद्यार्थ्यांना मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.