TheClearNews.Com
Friday, December 5, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सार्वजनिक ठिकाणी प्रचंड गर्दी, पुन्हा लॉकडाऊनचे निर्बंध घातले जाऊ शकतात : राजेश टोपे

The Clear News Desk by The Clear News Desk
November 24, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे व अन्य सार्वजनिक ठिकाणी प्रचंड गर्दी होती. विनामास्क फिरणारे वाढले आहेत, या सर्वांचाच विचार करून पुन्हा लॉकडाऊनचे निर्बंध घातले जाऊ शकतात. त्यासंदर्भात दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आगामी दोन महिन्यांत कोरोना अक्राळविक्राळ स्वरूप धारण करण्याची शक्यता असून राज्यात पुन्हा लॉकडाऊनचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी त्याचे संकेत दिले. अर्थात, हे लॉकडाऊन पूर्वीप्रमाणे नसले तरीही लग्न सोहळे, उद्याने, पर्यटनस्थळे, समुद्रकिनाऱ्यासह इतर अनेक गोष्टींबाबत कडक निर्बंध घातले जाण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्यात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. महाराष्ट्रातही हा आकडा वाढतो आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विमान, रस्ते मार्ग आणि रेल्वे मार्गाने महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी हे निर्बंध लागू आहेत. २५ नोव्हेंबरपासून हे निर्बंध लागू असल्याचे राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांनी जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केले आहे. चाचणी सकारात्मक आल्यास परत त्यांच्या राज्यात पाठवणी करण्यात येईल, तर लक्षणे दिसल्यास कोविड सेंटरमध्ये दाखल करणार आहे.

READ ALSO

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

हवाईमार्गे मुंबईत येणाऱ्यांनी आरटीपीसीआर चाचणीचा नकारात्मक अहवाल सोबत आणणे बंधनकारक आहे. महाराष्ट्रात येण्यापूर्वी ७२ तास पूर्वी चाचणी व्हावी. विनाचाचणी प्रवाशांची विमानतळावर चाचणी होईल. त्याचा खर्च प्रवाशालाच करावा लागणार आहे. विमानतळावर चाचणी केल्यानंतर प्रवाशांना घरी जाता येईल. कोरोना अहवाल सकारात्मक आल्यावरच प्रवाशाला माहिती कळवली जाईल. सध्या पुणे, नागपूर, औरंगाबदेत कोरोना रुग्ण वाढत आहेत. पुढील सहा दिवसांत राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येचा अभ्यास करण्यात येईल आणि त्यानंतर मिनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
गुन्हे

बापरे ! मेलेल्या महिलेस ‘जिवंत’ दाखवून मारला 19 लाखांवर डल्ला !

October 15, 2025
जळगाव

जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडला “राज्य निर्यात उत्कृष्टता” सुवर्ण पुरस्कार

October 13, 2025
राज्य

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

June 11, 2025
गुन्हे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

May 31, 2025
Next Post

‘लव्ह जिहाद’ : राज्यातील सामाजिक सौहार्द बिघडवू नका, सेनेचा भाजपला इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दागिने पॉलिश करताय, सावधान…चोपडा तालुक्यात दांपत्याला गंडवले !

December 23, 2022

खुल्या भव्य क्रिकेट स्पर्धेचा उत्साहपूर्ण समारोप

January 2, 2022

हतनूर धरणातून 80 हजार ते 1 लाख 25 हजार क्युसेस विसर्ग ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा !

July 18, 2022

आडगाव येथे कोरोना लसीकरणाच्या कॅम्पचे आयोजन

May 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group