जळगाव (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यात सध्या जोरदार शाब्दिक चकमक सुरू आहे. या वादात आता शिवसेना नेते गुलाबराव पाटील (Gulabrao-patil) यांनी उडी घेतली आहे. दोघांनी वाद वाढवल्यास या वादामुळे जिल्ह्याचंच भलं होणार नाही, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. या शाब्दिक युद्धाची पूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. मात्र आता या वादात शिवसेना नेते व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उडी घेतली आहे. ‘या दोघांचे हे वाद जुने आहेत. त्यात मला पडायचे नाही. मात्र दोघांनी वाद वाढवल्यास या वादामुळे जिल्ह्याचंच भलं होणार नाही, असे मला वाटते. या उलट सर्वांनी एकत्र येऊन काम केले तर जिल्ह्याचा विकास होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.