मुंबई (वृत्तसंस्था) कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी दणदणीत विजय मिळविला आहे. पण या पराभवासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची चांगलीच कोंडी झालेली पाहायला मिळत आहे. तसेच मी निवडणूक हरलो तर हिमालयात जाईन असं म्हणत आपल्या वक्तव्यावरून पलटी मारली आहे.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, आमचे नाना कदम लढले तर तुमच्या तोंडाला फेस आला. आम्ही विकासाच्या दृष्टीने कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक लढवली होती. हिंदुत्व हा आमचा अजेंडा नाही तर श्वास आहे. राजकीय आवश्यकता म्हणून आम्ही हिंदुत्व स्वीकारलं नाही. हिंदुत्व या शब्दात पुरोगामित्व आहे. विज्ञाननिष्ठ सुद्धा हिंदुत्ववादी आहेत. हिंदू शब्दात सर्वधर्म समभाव आहे. स्वत:च्या धर्माचं पालन करताना दुसऱ्या धर्माचा आदर करणं हिंदुत्व आहे अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंदक्रांत पाटील यांनी भाष्य केले आहे.
चंदक्रांत पाटील म्हणाले की, कोल्हापूर उत्तरमध्ये ३ पक्ष विरुद्ध भाजपा एकटी लढली. भाजपाने एकट्याने ७७ हजार मते मिळवली. पराभवाची कारणं शोधण्यात येतील. विकासाचे मुद्दे मांडले, हिंदुत्वाबाबत लपवाछपवी केली नाही. आम्ही कुठे कमी पडलो याचं चिंतन करण्यात येईल. मतदारांनी दिलेला कोल मान्य आहे. आम्हाला कुठलाही पश्चाताप नाही. प्रत्येक पक्षाचं धोरण वेगळे असतो. भाजपाच्या १५ महिला आमदार आहेत. जयश्री जाधव या भाजपाच्या होत्या परंतु काँग्रेस सत्तेत असल्याने त्याठिकाणी जाऊ निवडणूक लढवली. आम्ही सत्तेत असतो तर आमच्याबाजूने लढल्या असत्या असं त्यांनी सांगितले.
तसेच मी निवडणूक हरलो तर हिमालयात जाईन असं म्हटलं होतं. आमचे नाना कदम लढले तर तुमच्या तोंडाला फेस आला, मी लढलो नाही असं सांगत महाविकास आघाडीच्या नेत्यांना चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे. ज्या झाडाला चांगले आंबे असतात त्यालाच दगडं मारली जाते. चंद्रकांत पाटील लढले असते तर तुम्हाला कुणाला उभं करायचा हा प्रश्न निर्माण झाला असता. संघटना उत्तमपणे निवडणूक लढली असं चंद्रकांत पाटलांनी सांगितले.