अमळनेर (प्रतिनिधी) शहापूर येथे गावात कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखीत आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला.
येथील रघुनाथ सदाशिव पाटील यांचे सुपुत्र तर कळमसरे येथील भगवान आत्माराम चौधरी यांची सुकन्या यांचा विवाह ठरला असताना सदयस्थितीत सर्वत्र कोरोना आजाराचे सावट असल्याने त्यांनी या विवाह सोहळ्यात पत्रिका किंवा कुणालाही आमंत्रण न देता, मुलीचे चार नातेवाईक यात आई वडील आणि भाऊ यांना बोलावून मुलांकडील आई वडील भाऊ वहिनी असे दहा ते पंधरा नातेवाईक एकत्र येत हा विवाह सोहळा संपन्न झाला. कोरोना सारखा संसर्ग हा पसरत असल्याने नवरदेव मुलाचे मोठे भाऊ पशुवैद्यकीय डॉक्टर डिंगबर पाटील यांनी हा निर्णय घेऊन गावासह परिसरात आदर्श विवाह घडवून यापुढेही असाच विवाह सोहळा संपन्न व्हावा, म्हणजे विनाकारण होणारा खर्च कमी होऊन कर्जबाजारी सारख्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही, असे यावेळी त्यांनी सांगितले.