TheClearNews.Com
Monday, June 23, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अभिमान काढून देवासमोर विनम्र भावाने शरण गेल्यास सहज ईश्वरप्राप्ती – ह. भ. प. दीपक महाराज

The Clear News Desk by The Clear News Desk
December 4, 2020
in यावल
0
Share on FacebookShare on Twitter

साकळी ता. यावल (प्रतिनिधी) न्हावी ता. यावल येथील नाथ मंदिरात (विठ्ठल मंदिर) त्रिपुरारी पौर्णिमा काकडा आरती कार्तिक मास समाप्ती च्या निमित्ताने ह. भ. प. दीपक महाराज शेळगावकर यांची कीर्तन सेवा पार पडली. या सेवेत त्यांनी तुकाराम महाराजांच्या काला प्रकरणातला अभंग घेतला असून त्यांनी अभंगाचे निरुपण करताना सांगितले.

मनुष्याने स्वतःतील अभिमान काढून विनम्र भावाने शरण गेल्यास सहज ईश्वर प्राप्ती होऊ शकते. असे प्रतिपादन ह. भ. प. दीपक महाराज यांनी येथील विठ्ठल मंदिरात केले. एवढेच नाही तर श्रीकृष्णाच्या विविध रूपांचे वर्णन त्यांनी केले. त्रिपुरारी पौर्णिमा काकडा आरती कार्तिक मास समाप्ती च्या निमित्त ह. भ. प. दीपक महाराज शेळगावकर यांची कीर्तन सेवा श्रीनाथ मंदिरात पार पडली. अभंग संत श्री तुकाराम महाराज यांचा काला प्रकरणातला असून या अभंगातून तुकोबाराय म्हणतात की ब्रम्हादिकांना सुद्धा भगवंताच्या रूपाचे आकलन झालेले नाही. जगातील सर्वात शहाणा म्हटला गेलेला वेद असो अथवा सहस्र मुखाचा शेष यांनासुद्धा भगवंताच्या स्वरूपाचे पूर्णतः आकलन झालेले नसल्याचे कीर्तनातून त्यांनी प्रतिपादन केले. काकडा आरती चे महात्म्य सांगत असताना काकडा आरतीच्या दर्शनाने जीवाच्या सकळ पापांचा सहज नाश होतोच असल्याचे त्यांनी सांगितले. संसार रुपी निद्रेतून बाहेर पडून आत्म उद्धाराच्या दृष्टीने प्रयत्न करण्याकरिता पहाटेच्या वेळी काकड आरतीचे प्रयोजन वारकरी संप्रदायात असल्याचे महाराज यांनी स्पष्ट केले. आत्म कल्याणाच्या बाबतीत जागृत असलेल्या संतांनी जगाला खऱ्या अर्थाने जागृत करण्याकरिता काकड आरती ची रचना वारकरी संप्रदायात झाली असल्याचे स्पष्ट केले. काकड आरती ही भक्तीतून ज्ञानाकडे जाण्याचा आनंद मार्ग असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. “असो नसो भाव आलो तुझिया ठाया कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरीराया” काकड आरती निमित्ताने म्हणावयाच्या या पदातून सर्व प्रकारचा अभिमान काढून देवासमोर विनम्र भावाने शरण गेल्याने ईश्वरप्राप्ती सहज होत असते असे संत विचारांचे प्रतिपादन ह. भ. प. दीपक महाराज यांनी केले. श्रीकृष्ण परमात्म्याच्या गोकुळातील लीलांचे वर्णन काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने करत असताना तुकाराम महाराज म्हणतात की श्रीकृष्ण हा मोहरी पावा आणि हातात काठी घेऊन गाईंच्या मागे धावतो. गोकुळातील श्रीकृष्णाचे चरित्र हे उच्चारनिय असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीकृष्ण चरित्राचा उच्चार केल्यानंतर जारपुत्र म्हटल्या गेलेल्या व्यासांना सुद्धा जगद्गुरु ही उपाधी प्राप्त होते. राम आणि कृष्ण या दोन्ही अवतारातील फरक स्पष्ट करत असताना कृष्ण अवतारातील काला या विशेष प्रसंगाचे महात्म्य काल्याच्या कीर्तनातून महाराज यांनी व्यक्त केले. काल्याच्या प्रसंगी प्राप्त होत असलेला प्रसाद हा भाग्यवान असलेल्या गोपालांना खऱ्या अर्थाने प्राप्त झाला. देवादिकांना सुद्धा दुर्लभ असलेला हा काला मात्र वारकरी सांप्रदायिक संतांनी पंढरपूरच्या वाळवंटामध्ये पांडुरंगाच्या समवेत केल्याचे वर्णन महाराजांनी कीर्तनातून केले.

READ ALSO

हिंगोणा येथे मिरवणुकीत वाद; महिलेचा विनयभंग

अडीच लाखाचा हरभरा माथेफिरूने पेटवला !

” एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी” या पद्धतीने दिला जाणारा काला हा खऱ्या अर्थाने समभावाचे प्रतीक असल्याचे महाराजांनी कीर्तनातून सांगितले. आपल्या जवळील जे जे उत्कृष्ट आहे ते आधी देवाला द्यावे अशा प्रकारची भूमिका गोपाळांची असल्यामुळे देव खऱ्या अर्थाने गोपाळ भक्तांना कळाला. काला कीर्तनाच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णाच्या मख्खनधारी, शंखपुष्पधारी, चक्रगदाधारी, गोवर्धन धारी, मुरली धारी, गीता धारी, अशा विविध रूपांच वर्णन भक्ती भावपूर्ण सुमधुर पद्धतीने कीर्तनातून करण्यात आले. कीर्तन सेवेला गावातील सर्व हभप भजनी मंडळाचे सहकार्य लाभले. किर्तनाच्या सुरुवातीलाच रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष चौधरी यांनी ह. भ. प. दीपक महाराज यांना पुष्पहार अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतले. सोबत संस्थाध्यक्ष अनिल चौधरी, सचिव विलास भोगे व भारत विद्यालयाचे उपाध्यक्ष अनिल लढे उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

हिंगोणा येथे मिरवणुकीत वाद; महिलेचा विनयभंग

April 21, 2025
गुन्हे

अडीच लाखाचा हरभरा माथेफिरूने पेटवला !

March 17, 2025
यावल

बिबट्याच्या हल्ल्यात ७ वर्षीय मुलाचा मृत्यू, पालकमंत्र्यांकडून दुःख व्यक्त; वन विभागाला तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश

March 6, 2025
यावल

रिक्षात बसून शिक्षिकेने पुरवल्या कॉप्या ; मुख्याध्यापिकेसह तीन जणांविरुद्ध गुन्हा !

February 25, 2025
गुन्हे

अट्रावलमध्ये मुंजोबाच्या यात्रेत ११ महिलांचे सोनं चोरीला !

February 11, 2025
यावल

तुमच्या मुलास गुन्ह्यात पकडलेय, सोडवायचे असले तर पैसे द्या !

December 26, 2024
Next Post

डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांचे स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावच्या ‘अरोमिरा स्कूल ऑफ नर्सिंग’मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु !

July 13, 2022

कृषि विधेयकाविरोधात शेतकरी निघाले दिल्लीकडे ; पोलिसांना अलर्ट राहण्याचे आदेश

September 20, 2020

आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी उघडकीस आणलेल्या चाळीसगाव निवासी शाळा प्रकरणाची गंभीर दखल !

October 15, 2023

जिल्ह्यात आज आढळले अवघे ३ कोरोनाबाधित, १ झाला बरा !

November 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group