मुंबई (वृत्तसंस्था) शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच… असं म्हणत संभाजीराजेंनी राज्यपालविरोधांतील पुढील लढाईचे इरादे स्पष्ट करुन ‘राज्यपाल हटाओ’चा नारा त्यांनी दिलाय.
राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात संभाजीराजेंनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांची नियुक्ती झालेपासून सातत्याने महाराष्ट्र राज्य व महापुरूषांबाबत वादग्रस्त व अपमानास्पद विधाने करीत असून राज्यातील सामाजिक सलोखा व शांततेस बाधा पोहोचेल असे वर्तन त्यांच्याकडून होत आहे. अशा वर्तणुकीमुळे “राज्यपाल” या पदाचे देखील अवमूल्यन होत आहे.
तर संभाजीराजे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच!’, असे सांगतानाच शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच, असा एल्गारही त्यांनी पुकारलाय.