धरणगाव (प्रतिनिधी) – शहरात परवानगीशिवाय चालणाऱ्या “वीणा” फिल्टर प्लांटमुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. हा प्लांट महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची NOC आणि BIS मानांकन नसतानाही गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
या प्लांटमधून पुरवले जाणारे पाणी पूर्णपणे शुद्ध न करता थेट विकले जाते. पाण्यात घाण, दुर्गंधी आणि अशुद्धी आढळून आल्याने अनेक नागरिकांना पोटाचे विकार, उलटी-जुलाब यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.
“15 ते 20 मिनिटांत गावात पोहोचेल असं सांगून हे पाणी विकलं जातं. पण त्याची गुणवत्ता तपासलेली नाही. आम्ही याबत स्थानिक प्रशासनाकडे तक्रार केली होती, मात्र अद्याप कारवाई झालेली नाही,”
अवैध प्लांट तातडीने बंद करून सुरक्षित पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी. प्रशासनाने या तक्रारीची दखल घेऊन प्लांटची तपासणी करावी आणि कारवाई करावी, अशी अपेक्षा धरणगावकर व्यक्त करत आहेत.













