जळगाव (प्रतिनिधी) बचतगटांच्या नावाखाली १३ जणांना साडेतेरा लाखांत गंडवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगीता निरज जोशी, निरज जोशी, जागृती निरज जोशी, अशोक जयनारायण शर्मा, संतोष जयनारायण शर्मा, संजय जयनारायण शर्मा (सर्व रा. सांगवी, ता. शिरपुर, धुळे), अशी संशयितांची नावं आहेत.
वत्सला पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संगीता जोशी हिने जूलै २०१९ मध्ये पाटील यांच्या सुन कामीनी यांच्याकडून १५ हजार रुपये मेडीकल सामान खरेदीसाठी घेतले होते. यानंतर लागलीच वत्सला पाटील यांच्याकडून ५० हजार रुपये घेतले. हे पैसे देण्यासाठी वत्सला पाटील यांनी स्वत:चे दागिने गहान ठेवले होते. पैसे परत करण्यासाठी संगीता जोशी यांनी त्यांना ५० व ४० हजार रुपये दोन धनादेश दिले होते. पैसे परत करण्याची हमी शर्मा यांनी घेतली होती. आमच्याकडे पेट्रोल पंप आहे, भरपुर प्रॉपर्टी आहे. त्यामुळे चिंता करुन नका पैसे परत भेटतील असे शर्मा यांनी वत्सला पाटील यांना सांगीतले होते. परंतू, हे पैसे परत देण्यापूर्वीच जोशी कुटंुबीय घर सोडून निघुन गेले. यानंतर पाटील यांनी चौकशी केली असता जोशी कुटंुबीयांनी त्यांच्या कॉलनीत लघुउद्योग सुरू करण्याच्या नावााने अनेकांकडून पैसे घेतले होते. १३ जणांकडून १३ लाख ५० हजार २५० रुपये घेऊन जोशी कुटंुबीयांनी पोबारा केला ओह. या प्रकरणी गुरुवारी वत्सला पाटील यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वत्सला रमेश पाटील, कामिनी रामकृष्ण पाटील, संध्या दिलीत घोडेस्वार, मथुराबाई भरतसिंग भोपाळवध, कल्पना विजय नात, सुवर्णा भूपेंद्र वानखेडे, विजया भास्कर वानखेडे, समीर पठाण, रोशन शब्बीर खान, युनूस खान पठाण, सीमा चंद्रकांत सोनवणे, सायराबी शाकीर खान पठाण, रोशनबी शब्बीर खान यांना विविध बँक, पतपेढी व बचतगटांच्या माध्यमातून लघु उद्योग सुरू करण्याबाबत व पैशांबाबत वेगवेगळी आमिषे दाखवले. बचतगट स्थापन करून वेगवेगळ्या महिलांच्या नावे कर्ज पास करून घेतले. असे फिर्यादीत म्हटले आहे.