नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत ३० हजार ५४९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात ४२२ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३०,५४९ नवीन कोरोना रुग्ण आढळले. या दरम्यान ४२२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ४,२५,१९५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये ३८,८८७ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत देशात ३,०८,९६,३५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात रिकव्हरी रेट ९७.३८ टक्के आहे. गेल्या २४ तासांमध्ये, बरे झालेल्या रुग्णांची संख्या नवीन रुग्णांपेक्षा जास्त होती. यामुळे सक्रिय प्रकरणांमध्ये घट झाली आहे. सध्या देशात ४,०४,९५८ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
राज्यातील स्थिती
राज्यात काल दिवसभरात ४ हजार ८६९ नवीन कोरोनाबाधित आढळले तर, ८ हजार ४२९ रूग्ण कोरोनातून बरे झाले. याशिवाय, आज ९० रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली. राज्यात आजपर्यंत एकूण ६१,०३,३२५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.६५ टक्के एवढे झाले आहे. तर, आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,१५,०६३ झाली आहे. राज्यात आजपर्यंत १३३०३८ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे.