नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास १७१ ने वाढ झाली. गेल्या २४ तासांत ३६ हजार ५७१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ५४० कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३६ हजार ५७१ कोरोनाबाधित आढळले असून ५४० जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णांसह देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ३ लाख ६३ हजार ६०५ वर पोहोचली आहे. ही रुग्णसंख्या गेल्या १५० दिवसांतील सर्वात कमी आहे. तर गेल्या २४ तासांत ३६ हजार ५५५ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ३ कोटी १५ लाख ६१ हजार ६३५ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशाचा रिकव्हरी रेट ९७.५४ टक्क्यांवर आहे.
देशात कोरोनामुळे आतापर्यंत ४ लाख ३३ हजार ५८९ रुग्ण दगावले आहेत. सध्या विकली पॉझिटीव्हीटी रेट १.९३ टक्क्यांवर आहे. हा दर गेल्या ५६ दिवसांपासून ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर, डेली पॉझिटीव्हीटी रेट १.९४ टक्के असून हा दर गेल्या २५ दिवसांपासून सलग ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. आतापर्यंत ५०.२६ कोटी कोरोनाचा चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर, लसीकरण मोहिमेअंतर्गत ५७.२२ कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात काल ५ हजार २२५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ५ हजार ५५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख १४ हजार ९२१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९३ टक्के आहे. राज्यात काल १५४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.११ टक्के झाला आहे.
















