नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत २ हजारांनी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात ४६ हजार ७५९ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ५०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ४६ हजार ७५९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३१ हजार ३७४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एका दिवसात ५०९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी २६ लाख ४९ हजार ९४७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ३ कोटी १८ लाख ५२ हजार ८०२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात ३ लाख ५९ हजार ७७५ सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनामुळे देशात आतापर्यंत ४ लाख ३७ हजार ३७० जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ६२ कोटी २९ लाख ८९ हजार १३४ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे. गेल्या २४ तासात १ कोटी ३ लाख ३५ हजार २९० जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात काल ४,६५४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३ हजार ३०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख ५५ हजार ४५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०२ टक्के आहे. राज्यात काल १७० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे. राज्यात सध्या ५१ हजार ५७४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.