नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी येताना दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांची संख्या ही लाखाच्या आत आल्याने काहीसा दिलासा मिळत आहे. गेल्या २४ तासांत ९२ हजार ५९६ रुग्णांची भर पडली असून तर २२१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात दिवसभरात ९२ हजार ५९६ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत एक लाख ६२ हजार ६६४ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. मृतांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत असून, गेल्या २४ तासांत देशात दोन हजार २१९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मागील २४ तासांत देशात आढळून आलेले नवीन रुग्ण – ९२,५९६
गेल्या २४ तासांत कोरोनातून बरे झालेले रुग्ण – १,६२,६६४
देशात मागील २४ तासांत झालेले मृत्यू – २,२१९
देशातील एकूण रूग्णसंख्या – २,९०,८९,०६९
आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्यांची संख्या – २,७५,०४,१२६
देशात कोरोनामुळे झालेले एकूण मृत्यू – ३,५३,५२८
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या – १२,३१,४१५
राज्यातली परिस्थिती
राज्यात दिवसभरात (८ जून) १६ हजार ५७७ रूग्ण कोरोनातून बरे झाले. तर, १० हजार ८९१ नवीन को रोनाबाधित आढळून आले. २९५ कोरोनाबाधितांच्या मृ्त्यूची नोंद झाली. राज्यात आजपर्यंत एकूण ५५,८०,९२५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.३५ टक्के झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.७३ टक्के इतका आहे.