चोपडा (प्रतिनिधी) भारताच्या माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांची आज दि.१९ रोजी जयंती भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या त्या कन्या होत्या. सुरुवातीला विरोधकांनी हिणवलेल्या इंदिरा गांधी यांना त्याच विरोधकांनी पुढे ‘दुर्गा’ म्हणून संबोधले. आणीबाणीवरुन त्यांच्यावर टीका केली. मात्र, भारताच्या या ‘आयर्न लेडी’ने आपलं नेतृत्त्व सक्षमपणे सिद्ध केले असल्याचे मत काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील यांनी केले.
चोपडा येथे शहर व तालुका काँग्रेस च्या वतीने माजी पंतप्रधान (स्व.)इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सुरुवातीला इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी जी प सदस्य डॉ.सुरेश पाटील, चोसाका संचालक शिवाजी देसले , तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे, शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे, आदी होते.
ॲड.संदीप पाटील पुढे म्हणाले की, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं खमकं नेतृत्त्व म्हणून इंदिरा गांधी यांचं नाव आजही आदराने घेतलं जाते.त्यांनी १४ बँकांचे राष्ट्रीयकरण केले. यावेळी अमर रहे, अमर रहे, इंदिरा गांधी अमर रहे..! अशा घोषणा देण्यात आल्यात. यावेळी हमीद मिस्त्री, अशोक साळुंखे, देविदास सोनवणे, रमाकांत सोनवणे ,बाळकृष्ण पाटील ,रमेश शिंदे, देवानंद शिंदे, रमेश पाटील, आरिफ सिद्दिकी, इस्माईल तेली, विकास सोनवणे, संजय बोरसे, संजय शिंदे, देवकांत चौधरी, अरुण कंखरे,अशोक पाटील, गोपाल धनगर, राजेंद्र पाटील, देविदास धनगर, राजकुमार सोनवणे, देविदास पारधी आदी उपस्थित होते.