लंडन (वृत्तसंस्था) कर्जबुडवा उद्योगपती आणि मद्यसम्राट विजय मल्ल्या पूर्णपणे कंगाल झाल्याची माहिती आहे. कोर्ट कचेऱ्यांचा फेरा मागे लागल्याने आर्थिक नाकेबंदी झाल्याने मल्ल्याकडे वकिलांना देण्याइतपतही पैसे नाहीत. त्यामुळे वेळेत फी नाही दिली तर खटला लढणार नसल्याचा इशारा त्याच्या वकिलाने दिला आहे.
लिकर किंग आणि कर्जबुडव्या विजय मल्ल्या कंगाल झाला आहे. त्याच्या वकिलालाही देण्यासाठीही पैसे उरलेले नाहीत. शुक्रवारी विजय मल्ल्याने एक तातडीचा अर्ज यु.के.च्या कोर्टात दाखल केला आहे. ज्या अर्जात त्याने त्याचे बँक अकाऊंट हाताळण्याची संमती मागितली आहे. एवढंच नाही तर फ्रान्समधली संपत्ती विकल्यानंतर जे पैसे आले आहेत त्यातले १४ कोटी रुपये देण्यात यावेत असंही विजय मल्ल्याने म्हटलं आहे. विजय मल्ल्याची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. ही बँक खाती पुन्हा कार्यान्वित करण्यात यावीत असंही त्याने म्हटलं आहे. कर्ज घोटाळा केल्याचा जो खटला सुरु आहे त्याची फी भरण्यासाठी आपल्याला पैसे हवे आहेत असंही विजय मल्ल्याने या अर्जात म्हटलं आहे. वेळेत फी दिली नाही तर आपण खटला लढणार नाही असं विजय मल्ल्याच्या वकिलाने त्याला सांगितलं आहे त्यामुळे त्याच्या अडचणीही वाढल्या आहेत. भारतातल्या एसबीआयसह प्रमुख बँकांचं ९ हजार कोटींचं कर्ज बुडवून विजय मल्ल्या फऱार झाला आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताचे कसोशीचे प्रयत्न सुरु आहेत. कधीकाळी पैशांची उधळपट्टी करणाऱ्या मल्ल्याला आता मात्र आर्थिक घरघर लागली आहे. त्याला लंडनमध्ये हजार आणि लाख रुपयांचाही हिशोब ठेवावा लागत आहे. त्याच्या वैयक्तिक खर्चांनाही चाप लागला असून वकिलांना देण्यासाठीही त्याच्याकडे पैसे उरले नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.
आर्थिक चणचणीमुळे कोंडीत सापडलेल्या मल्ल्याने लंडनच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. फ्रान्समधील मालमत्ता विकल्यानंतर आलेल्या रकमेपैकी १४ कोटी रुपये आपल्याला देण्यात यावेत, अशी विनंती त्याने या याचिकेतून कोर्टाला केली आहे. लंडनमध्ये मल्ल्याच्या बाजूने खटला लढवणाऱ्या वकिलाला त्याची फी मिळाली नाही. त्यामुळे या वकिलाने पुढच्या सुनावणीपर्यंत रकम न मिळाल्यास खटला लढणे बंद करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.