भुसावळ (प्रतिनिधी) कोविड-१९ संबंधित कर्तव्य बजावताना संक्रमणामुळे मृत्यू झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोना विमा कवच, सानुग्र्हाय अनुदान देण्यात येते का? अशी माहिती येथील नगरपरिषदेकडे माहिती अधिकार कायद्यानुसार भारतीय जनता पार्टी वैदकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नितु पाटील यांनी मागितली आहे.
नगरविकास प्रशासन, महाराष्ट्र शासन यांनी कोविड-१९ संबंधित कर्तव्य बजावताना कोविड संक्रमणामुळे मृत्यू झालेले अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची तसेच केंद्र/राज्य सरकारने लागू केलेल्या कोरोना विमा कवच लाभ याविषयी ११ मुद्यांवर तपशीलवार माहिती मागितली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या निर्णयानुसार अनु.३ (ब)(५) नुसार किती महानगरपालिका/नगरपालिका/मार्गपरिषद/नगरपंचायतीनी या योजनेसारखीच सानुग्र्हाय सहाय्याची योजना लागू केली आहे का? असल्यास त्याचा परिपूर्ण तपशील, सदर योजना लागू करण्यासाठी कोणत्या अडचणी होत्या त्यांचे स्पष्टीकरण? सदर योजना सारखीच योजना लागू करण्याची पात्रता/कुवत आहे किवा कसे ? तसेच योजना लागू करावयाच्या झाल्यास निधीची उपलब्धता कश्या प्रकारे करण्यात येणार आहे ? वरील मुद्द्यांवर माहिती अपेक्षीत असून मात्र आता भुसावळ नगरपालिका कोणत्या मुद्द्यावर खुलासा करते हे सर्व भुसावळकरांना समजेल. “अ” वर्ग नगरपरिषद असून देखील आजतागायत या शासन निर्णयाकडे नगरपरिषद आणि लोकप्रतिनिधींनी कारवाई केली नाही. कोरोना महामारीमध्ये ज्या-ज्या अधिकारी, कर्मचारी आणि आरोग्य सेवकांनी जीवाची पर्वा न करता कोरोना काळात कार्य केले. प्रसंगी कोरोना संक्रमण होऊन मयत झाले तरी त्यांच्या बददल आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल भुसावळ नगरपालिकेला कुठलेही आस्था दिसून येत नाही. असे ६०० च्या जवळपास कर्मचारी आहेत.
भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी भुसावळच्या वतीने प्रमुख मागण्या आहेत.
१. कोरोना संक्रमणाची दुसरी लाटेची शक्यता पाहता संपूर्ण भुसावळ नगरपरिषद कर्मचारी, अधिकारी वर्गाची केंद्र/राज्य सरकार् सारखी “ कोरोना विमा कवच योजना “ काढण्यात यावी.
२. शहीद झालेले कोरोना योध्या कै. प्रकाश दुरकुले आणि कै. विजयसिंग राजपुत यांना एकरकमी सानुग्रहाय मदत म्हणून प्रत्येकी २१ लाख रु. देण्यात यावे.
वरील बाबींची पूर्तता पुढील १५ दिवसात करण्यात यावी, तसेच हि पूर्तता न झाल्यास नगरपरिषद समोर तीव्र आंदोलन करू. असे आवाहन भारतीय जनता पार्टी वैदकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नितु पाटील यांनी जळगाव जिल्हाधिकारी, रावेर लोकसभा खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, भुसावळ विधानसभा आमदार संजयजी सावकारे, भुसावळ विभाग तहसीलदार साहेब यांना केले आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टी वैदकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नितु पाटील, जळगाव जिल्हा अध्यक्ष उत्तर भारतीय आघाडीचे रमाशंकर दुबे, भुसावळ शहर अध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे, संदीप सुरवाडे, शिशिर जावळे आदी उपस्थित होते.