जळगाव (प्रतिनिधी) शिवतीर्थ मैदान परिसरात रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास दोन गटात वाद झाला. वादातून काही तरुणांनी २ राउंड गोळ्या झाडल्याची चर्चा आहे. यानंतर रात्री पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. परंतू त्यांना गोळीबाराचा कोणताही पुरावा मिळून आलेला नाही.
या मैदानावर क्रिकेट स्पर्धेचा रविवारी अंतिम सामना संपल्यावर तरुणांचा मोठा जमाव बाहेर पडला. नेमके याच वेळी दोन गटात वाद झाला. त्यात एकाकडून गोळीबार झाल्याचे सांगण्यात आले. या वेळी तिघांनी जीव वाचावीत पळ काढल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत आणि कर्मचारी पोहचले. घटनास्थळी एक ट्यूब लाईट फोडलेली आढळून आली.