जामनेर (प्रतिनिधि) तालुक्यातील वरखेडी गावाजवळ असलेल्या रस्त्यावर मालवाहू गाडीला भरधाव येणारी दुचाकी आदळल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी १७ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. तर तिसरा तरुण हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी फत्तेपुर पोलीस ठाण्यात अकस्मात मूर्तीची नोंद करण्यात आली आहे. पितांबर डिगंबर जोशी (वय-२८) व बापु रविंद्र गोपाळ (वय-२७) रा. कुंभारी तालुका जामनेर असेच मयत झालेल्या तरुणांचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील माहवाहु पिकअप हि गाडी फर्दापुरकडून येत असतांना वरखेडी गावाच्या पुढे उतारावर बंद पडली. त्याच्या मागे येत असलेल्या दुचाकीवर प्रशांत रवींद्र गोपाळ, पितांबर जोशी व शुभम जयेंद्र गोपाळ हे तिघेजण कुंभारीला येत होते. पिकअप बंद पडल्याने मागून वेगाने येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. यात प्रशांत गोपाळ हा जागीच तर पीतांबर जोशी याला जळगाव येत उपचारासाठी नेत असतांना दगावला तिसरा शुभम गोपाळ जबर जखमी असल्याने याला गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातांची माहिती मिळाल्याने गावातील ग्रामस्थ व पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. अपघातात प्रशांत गोपाळ व पीतांबर जोशी याच्या मृत्यूची बातमी गावात पसरल्याने गावात शोककळा पसरली. दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही तरुणांची एकाच वेळी अंत्ययात्रा काढण्यात आली. पीतांबर जोशी याला तिन मुली, पत्नी असून प्रशांत गोपाळ याला एक मुलगा, एक मुलगी व पत्नी असा परिवार आहे.