जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाली असून सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी ‘नागोबांविरोधात जेडीसीसी जागृत जनमंच’ या शीर्षकाखाली लेख लिहिलेला असून जेडीसीसी जागृत जनमंच तयार आहे. लढाऊ लोकांना मदत करणार असल्याचे यात म्हटले आहे.
शिवराम पाटील यांची पोस्ट जशीच्या तशी
आम्ही जळगाव जागृत जनमंचने जेडीसीसी जागृत जनमंच पैनेल तयार केले आहे का? आम्हाला बँक लुटायची नाही. आम्ही कर्ज घेऊन साखर कारखाना घ्यायचा नाही. कर्ज काढून हायवेची जमीन घ्यायची नाही. मृत माणसाच्या नावे कर्ज घ्यायचे नाही. आम्हाला चोपड्याला जाऊन नोटा बदलून घ्यायच्या नाहीत. म्हणून मीच आमदार, मीच मंत्री, मीच जेडीसीसी संचालक, मीच दूध फेडरेशन संचालक, मीच विद्यापिठात सिनेट ,हे थांबवायचे आहे. त्यावर बसलेल्या नागोबांना हाकलायचे आहे.म्हणून फक्त जागृत माणसांचा जागृत प्रतिनिधी ,शहाणा प्रतिनिधी, दिडशहाणा प्रतिनिधी जो मंत्री चा कान पिळू शकतो,असा माणूस संचालक बनवायचा आहे.ज्याला जेडीसीसी कळते.ज्याला त्याचे काम,कायदे,वायदे कळतात अशा माणसाने उमेदवारी अर्ज करावेत.अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी?अशा भाकरभाऊचे आम्ही समर्थन करीत नाहीत. मीच आमदार, मीच संचालक, माझाच मुलगा संचालक, माझीच मुलगी चेयरमन असा हापापलेला पणा करायचा नाही. तेथे पाहिजे पर्याय. जो लोकशाही ला अपेक्षित आहे.एकदा झाले ना आमदार,!काय बोंब पाडली?काय दिवे लावले? एकदा झाले ना संचालक!सांगा काय बोंब पाडली?काय दिवे लावले?असा प्रश्न जिल्ह्यात कोणी विचारत नाहीत.तो आम्ही विचारतो.कारण,आम्ही कोणा आमदाराची संत्रा,मोसंबी,टैंगो घेतलेली नाही. कोणा आमदाराच्या मंडपातील खिचडी गिळली नाही. म्हणून आम्ही बाणेदारपणे म्हणतो,या मर्दांनो,आमच्या सोबत या.पुढाऱ्यांची थैली धरून, झोऱ्या टाकून,त्याची गाडी पुसून आयुष्य वाया घालवण्यापेक्षा आमच्या कडे या.तुमच्या कडे कोणताही आमदार ,मंत्री वर मान करून बोलणार नाही. जसा शेण खाल्लेला कुत्रा वर मान करून भुंकत नाही. कमीशन खाल्लेला आमदार वर मान करून आमच्या समोर उभा राहू शकत नाही. कोणत्याही पक्षातील जे जे मर्दासारखे राजकारण करु ईच्छित असतील तर आमच्या फौजेत या.शिलेदारासारखे लढा.
बाटग्यांसारखे लपू नका.रडू नका.
आमचा हेतू आहे..
१)जो आधी संचालक होता आणि आज संचालक आहे तो पुन्हा नको
२)जो आधी आमदार होता,आज आमदार आहे तो संचालक नको.
कारण संचालक पद ही नोकरी नाही, मरेपर्यंत तुम्हीच असणार.
संचालक पद ही जहागिरी नाही, तुमच्या कुटुंबात धरून बसणार.
राजकीय पक्षात अनेक लोक काम करतात. मोर्चा, आंदोलन करतात.दगड,काठी, कोंबड्या फेकतात. कशासाठी? सत्तेत स्थान मिळावे म्हणूनच ना!कि,हॉटेल चे खाऊन बील न देता पळून जाण्यासाठी? नेत्याच्या ताटातील सांडलेले खाऊन जगण्यासाठी? समोरचा माणूस मोठा आहे.श्रीमंत आहे.प्रस्थापित आहे.असे भय मनात असेल,असे बोलत असाल तर युद्धाआधीच आत्महत्या करून घेत आहात.आम्ही लढून मरणार आहोत.आम्ही शत्रूशी लढतांना मरणार आहोत.असेल हिंमत तर या सोबत.
आम्ही जेडीसीसी जागृत जनमंच तयार आहे.लढाऊ लोकांना मदत करीत आहोत.जेडीसीसीत मधे उमेदवारी अर्ज करा.एक पैनल बनवून लढा देऊ.तुम्ही याला तर तुमच्या सोबत!नाही आले तरी मिशन जारी राहिल.
….शिवराम पाटील.
ः9270963122
जळगाव जागृत जनमंच.