जळगाव (प्रतिनिधी) खान्देशी रक्षक ग्रृप संस्था महाराष्ट्र तर्फे कोजागिरी पौर्णिमेचे आवचित्त साधुन सहवास मंतिमद वनकुटे सोनबर्डी ता. धरणगाव येथील मुला-मुलींना घेवून दुध आटवून पौर्णिमा साजरी करण्यात आली.
आशा महान समाज सेवेच्या कार्यास खान्देशी रक्षक ग्रृप संस्था महाराष्ट्र चे धरणगाव येथिल रक्षक जयदीप पाटील, महिन्द्र गायकवाड हे प्रमुख मान्यवर म्हणुन उपस्थित होतें. त्या प्रसंगी सवास मंतिमंद संस्थाचे संचालक समाधान सावंत विश्र्वास सावंत मयुर चौधरी यांनि आभार व्यक्त केले. खान्देशी रक्षक ग्रृप संस्था महाराष्ट्र ही एक महाराष्ट्र खान्देशाती आजी माजी रक्षकांची संघटना असुन आधि ही या ग्रृप तर्फे अशीच आनोखि मोहीम हाती मती मंद मुला मुलींसाठी राबवली गेली त्यावेळेस खान्देशी रक्षक ग्रृप संस्था महाराष्ट्र तर्फे वाह्या पुस्तक आणि गरम पाणि करण्याचे गीजर या मुलां मुलींना देण्यात आले होते.
खान्देशी रक्षक ग्रृप संस्था महाराष्ट्र चे रक्षक जयदीप पाटील, महिन्द्र गायकवाड यांनी संभाषणात सागीतले की राजकिय नेते काय करत आहेत आम्हाला माहीत नाही पण मानुसकीचा धर्म पाळुन ह्या मुलांन कडे लक्ष दिले पाहिजे. कार्यक्रमा बद्दल खान्देशी रक्षक ग्रृप संस्था महाराष्ट्र चे संस्थापक मा. सचिन दादा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आणि ज्या ज्या वेळेस सन तैव्हार किंवा आशा मुलांना मदत लागली तर २४ तास खान्देशी रक्षक ग्रृप संस्था महाराष्ट्र समाजसेवा साठी खबिर पणे उभा आहे. खान्देशातील सर्व आजी माजी रक्षकांचे कौतुक केले.