नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जीवनात आनंद, भरभराट आणि सुखसमृद्धी येण्यासाठी काही नियम ज्योतिष शास्त्राची शाखा असणाऱ्या वास्तुशास्त्र अभ्यासाद्वारे बनवले गेले आहेत. या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अनेक घरांमध्ये वास्तु दोष आढळतात. मात्र, वास्तुशास्त्रानुसार (Vastu shastra) घर नसेल तर विविध समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. ज्यामध्ये पैशांची उधळपट्टी होऊ लागते आणि विनाकारण पैसे वाया जाऊ लागतात. पैसे हरवणे, अडकणे आणि चोरी होण्यापासून वाचवणे यासाठी वास्तुशास्त्रात कोणते उपाय सांगितले आहेत ते जाणून घेऊयात.
१. तुम्ही जर एखादे नवीन घर घेतले आहे किंवा बांधले आहे आणि तिथे राहायला गेल्यानंतर सतत पैशांची हानी होत आहे. तर एखादा वास्तुदोष असू शकतो. यावर उपाय म्हणून घराच्या एका कोपऱ्यात तुरटीचा तुकडा ठेवू शकता. पण, लक्षात ठेवा की तुरटी अशा ठिकाणी ठेवावी जिथे ती कोणाला दिसणार नाही. असे केल्याने तुमच्या घरातील वास्तुदोष संपून तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हाल.
२. वास्तूशास्त्रानुसार असे मानले जाते की, जर तुमच्या घराचे दरवाजे तुटलेले असतील, उघडताना आणि बंद करताना त्यामध्ये आवाज होत असेल किंवा दरवाजा उघडताना आणि बंद करताना अडकत असेल तर या तिन्ही परिस्थितीत तुमचे नुकसान होण्याची शक्यता असते. यामुळे तुमची धन हानी होऊ शकते. तुमच्या घराच्या दाराच्या अशा काही समस्या असल्यास लवकरात लवकर त्याचे निराकरण करा.
३. अनेकदा आपण घरातील छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. घराच्या छतावरील टाकीतून टपकणारे पाणी किंवा घरातील खराब नळातून टपकणारे पाणी. वास्तुशास्त्रानुसार घरातील नळातून पाणी टपकणे अजिबात चांगले नाही. वास्तूशास्त्रानुसार असे मानले जाते की, सतत पाणी वाहत असल्याने घराचे उत्पन्नही पाण्यासारखे वाहू लागते. घर बांधताना हेही लक्षात ठेवावे की पाण्याचा निचरा घरामध्ये नेहमी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असावा.
४. घरातील गॅस किंवा स्टोव्हवर नेहमी भांडी ठेवू नयेत, यामुळे आई अन्नपूर्णेचा अपमान होतो, असे वास्तू तज्ञांचेही मत आहे.