नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल ९ हजारांनी वाढ झाली. गेल्या २४ तासांत ४६ हजार २८० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ६०५ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयांने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ४६ हजार २८० कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. दरम्यान, ३४ हजार २४२ लोक उपचार घेत बरे झाले तर यामध्ये ६०५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे ५६ दिवसानंतर कोरोनाच्या नवीन प्रकरणात वाढ झाली आहे. यापूर्वी १ जुलै रोजी ४६ हजार ७८१ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती.
देशातील सध्याची कोरोनास्थिती
मागील २४ तासात एकूण नवीन रुग्ण : ४६,२६५
मागील २४ तासात एकूण बरे झालेले रुग्ण : ३४,२४२
मागील २४ तासात एकूण मृत्यू : ६०५
आतापर्यंत एकूण संक्रमित : ३.२५ कोटी
आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण : ३.१७ कोटी
आतापर्यंत एकूण मृत्यू : ४.३६ लाख
सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या : ३.२७ लाख
राज्यातील स्थिती
राज्यात बुधवारी ५०३१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४ हजार ३८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख ४७ हजार ४१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के आहे. राज्यात बुधवारी २१६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे. राज्यात सध्या ५० हजार १८३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.