औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबाद (Aurangabad) शहरातील क्रांतीचौकात जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांवर आली असावी. उन्हात निघालेल्या वऱ्हाडा सोबत चक्क मंडपही चालत निघाला. एका जागेवर उभा राहणारा मंडपच चक्क रस्त्याने चालत होता.
शहरातील क्रांतीचौकातून एक वरात निघाली होती, बॅण्ड ही वाजत होता बॅण्डच्या तालावर वऱ्हाडी मंडळी ही नाचत होती,उन्हाचा पारा ही चढला होता मात्र भर उन्हातही मंडळी सावलीत नाचत आणि चालत होती त्यांच्या डोक्यावर चक्क कापडी मंडप चालत होता या भन्नाट कल्पनेने चौकातून जाणाऱ्या येणाऱ्या नागरीकांच्या नजरा वरातीकडे जात होत्या. आणि चालणाऱ्या या मंडपाची दृश्य काही जण कॅमेऱ्यात ही कैद करत होते.
शहरातील एका विवाह सोहळ्याच्या वरतीसाठी खास करून मध्यप्रदेश च्या इंदोर शहरातून एक चालता फिरता कापडी मंडप आणण्यात आला होता. मंडपाला चार ही बाजूनं चाक लावण्यात आली होती, हा मंडप पुढे नेण्यासाठी कामगार ही लावण्यात आली होती, इतक्या भर उन्हात अंगाची लाही होण्याच्या धाकाने कुणी बाहेर पडण्याची हिंमत करत नसताना. वऱ्हाडी मात्र या मनसोक्त पणे झिंगाट डान्स करत होती. बॅण्ड पथक ही मंडपा सोबत सावलीत गाण्याच्या धुन वाजवत होते. पहिल्यांदाच अशा प्रकारचा चालणारा मंडप वरतीसाठी आणण्यात आल्याने सोशल मीडिया वरही या मंडपच्या चर्चाना उधाण आलं आहे. वऱ्हाडा सॊबत चालणाऱ्या या मंडपाने सर्वातचं लक्ष वेधून घेतलं होतं.