जळगाव (प्रतिनिधी) जळगाव महापालीका क्षेत्रातील समस्यांबाबतीत सोशल मिडीयाच्या माध्यमातुन उत्तमपणे “रिल” बनविणाऱ्यास “जळगाव शहर रिलबाज” पुरस्कार देण्यात येईल, असा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आज झालेल्या शहर बैठकीत करण्यात आला.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष व मनसे नेते यांच्या संकल्पनेतुन नुकतेच मुंबई येथे महाराष्ट्राचा “रिलबाज” असा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.. याप्रसंगी पक्षाचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातुन आलेल्या रिलबाज तरूणांना संबोधित करतांना सांगीतले की, रिल बनवणे एक कला आहे आणि या माध्यमातून समाजाचे प्रबोधन होईल अशा रिल्स बनवाव्यात. मा.राज साहेब ठाकरे यांच्या या संकल्पने जळगाव शहरातील ज्वलंत समस्यांवर शहरातील सोशल मिडीयावर कार्यरत असणाऱ्या रिल्स कलाकारांनी रिल बनवाव्या व जळगांव शहरातील नागरीकांना जागरूक करावे ही संकल्पना सुचली अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. जमील देशपांडे यांनी दिली.
रिलबाज पुरस्कार प्रथम बक्षीस – – २१००/-, द्वितीय पुरस्कार – ११००/- व तृतीय बक्षीस – ५०१/- व प्रत्येक सहभागी रिलबाज कलाकारास सहभाग प्रमाणपत्र मनसेतर्फे देण्यात येईल. रिल्स या जळगाव शहराच्या समस्येवरच असली पाहीजे, व्यक्ती किंवा समाजाच्या भावना दुखावणार नाहीत अशा रिल्स स्विकारल्या जाणार नाही, एका रिलबाजची एकच रिल स्पर्धेत स्विकारण्यात येईल.
रिलबाज कलाकारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहरातील पदाधिकारी राजेंद्र निकम (९४२२७७७२३७) ललित शर्मा (९३७००००९६५), साजन पाटील (८३२९२३३६०८), प्रकाश जोशी (९५९५१४७७७१), महेंद्र सपकाळे (९६८९३८१५९७) यांचेकडे दि. १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत रिल्स मोबाईल द्वारे द्यायच्या आहेत. जमा झालेल्या रिल्स मधुन उत्तमपणे पथदर्शी सामाजिक प्रबोधन करणाऱ्या रिल्सची निवड समितीतर्फे करण्यात येईल.
दरम्यान शहर बैठकीत आगामी महानगरपालीका निवडणूक संदर्भात प्राथमिक स्वरूपात चर्चा करण्यात आली व जळगांव शहरातील समस्यांवर गंभीरपणे चर्चा करण्यात आली व आगामी काळात मनसे तर्फे जनजागृती अभियान शहरामध्ये राबविण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले.
शहर बैठकीला जिल्हाध्यक्ष अॅड. जमील देशपांडे, महानगरध्यक्ष विनोद शिंदे, उप शहराध्यक्ष आशिष सपकाळे, ललित शर्मा, चेतन पवार, जनहित चे राजेंद्र निकम सचिव महेंद्र सपकाळे, विकास पाथरे, सागर पाटील, अविनाश जोशी, भिकन शिपी, साजन पाटील, रज्जाक सय्यद, प्रकाश जोशी, प्रमोद रूले, श्रीकृष्ण मेहेंगळे, खुशाल ठाकुर, हरीओम सुर्यवंशी, पवन सपकाळे, योगेश पाटील, संदीप मांडोळे, हर्षल वाणी, सुदाम राठोड, जिवराम सपकाळे, प्रशांत बाविस्कर हे उपस्थित होते.