कराड (वृत्तसंस्था) सातारा जिल्ह्यातील काही भागात तसेच कोयना धरणाजवळ रविवारी सकाळी ९.१७ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसलेले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.३ इतकी नोंदवण्यात आली आहे. सकाळी झालेला भूकंप कराड व पाटण तालुक्यातील लोकांना जाणवला आहे.
महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील काही भागांत भूकंपाचे काही सौम्य धक्के जाणवले आहेत. भूकंपाची 3.3 रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के साताऱ्यात जाणवले आहेत. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हे धक्के जाणवले. अचानक जाणवलेल्या या धक्क्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. परंतु, सौम्य धोका असल्यामुळं कोणतीही हानी झालेली नाही. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं ही माहिती दिली आहे.
सकाळी मणिपूरमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार, ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के आज सकाळी ६ वाजून ५६ मिनिटांनी उखरूल, मणिपूरमध्ये जाणवले. दरम्यान, मणिपूरमध्ये जाणवलेले भूकंपाचे धक्केही सौम्य असून कोणतीही जीवीतहानी किंवा वित्तहानी झालेली नाही.