जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील खासदारांना (Maharashtra Member of Parliament) जो विकासनिधी मिळाला आहे, त्यापैकी केवळ 45.38 टक्के निधिच आतापर्यंत खर्च करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच 2019 पासून आतापर्यंत खर्च करण्यात आलेल्या विकासनिधीपैकी सर्वाधिक खर्च हा जळगाव लोकसभा मतदार संघाचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी केला आहे.
जळगावचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी आतापर्यंत सर्वाधिक विकासनिधी खर्च केला आहे. त्यांनी आपल्या विकासनिधी पैकी तब्बल 97.30 टक्के विकासनिधी खर्च केला आहे. तर भाजपच्याच खासदार बीडच्या प्रीतम मुंडे यांनी आपल्या विकासनिधी पैकी एक रुपयाही खर्च केलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. ‘दिव्य मराठी’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे.
सर्वाधिक निधी कुणी केला खर्च?
सर्वाधिक खर्च केलेल्या खासदारांमध्ये भाजपचे जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांचा अव्वल क्रमांक आहे. त्यांनी आपल्या निधीपैकी एकूण 97.30 टक्के निधी खर्च केला आहे. त्यानंतर लातूरचे भाजपचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी 76.73 टक्के निधी खर्च केला. उत्तर-पूर्व मुंबईचे भाजप खासदार मनोज कोटक यांनी 66.71 टक्के, जळगावच्या खासदार रक्षा खडसे यांनी 63.51 टक्के निधी खर्च केला आहे.
‘यांनी’ केला सर्वात कमी केला निधी खर्च?
बीडच्या भाजपच खासदार प्रीतम मुंडे (मंजूर निधी – 2.5 कोटी, खर्च निधी टक्केवारी – 00 टक्के),सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेशवर महाराज (मंजूर निधी – 5 कोटी 50 लाख, खर्च निधी टक्केवारी – 9.10 टक्के), सांगलीतील भाजपचे खासदार संजयकाका पाटील (मंजूर निधी – 5 कोटी 39 लाख, खर्च निधी टक्केवारी – 13.67 टक्के), जालना भाजपचे खासदार रावसाहेब दानवे (मंजूर निधी 2.5 कोटी 45 लाख, खर्च निधी 16.1 टक्के), मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे (मंजूर निधी 5 कोटी 1.20 लाख, खर्च निधी 22.3 टक्के), यवतमाळ-वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी (5 कोटी 1.10 लाख, खर्च निधी 22.12 टक्के)