पाळधी (प्रतिनिधी) येथील एम.टी.पी. उर्दू हायस्कूलमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. यावेळी मराठी भाषेचे महत्त्व व उद्देश अकील यांनी स्पष्ट केले.
प्रमुख पाहुणे म्हणून साबीर मुस्तफा आबादी, कार्यक्रमाचे अध्यक्ष मुश्ताक करीमी होते तर सूत्रसंचालन सईद शाह यांनी केले. यावेळी इक्बाल खान, अकील अजीज, नईम बिस्मिल्लाह, वसीम, समरीन, रुबिना, चिरागोद्दीन काजी व जहुर देशपांडे उपस्थित होते. आभार प्रदर्शन शेख नईम बिस्मिल्लाह यांनी केले. तसेच यावेळी सबा अंजुम शकील शाह, खदिजा युसुफ, दानिश शकील या विद्यार्थ्यांनी कथाकथन सादर केले. सुंदर हस्ताक्षर लेखन प्रथम क्रमांक जहाँ आरा खलील आणि द्वितीय क्रमांक साद सरफराज देशमुख या विद्यार्थ्यांनी पटकावला.