मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई मंत्रालय बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपुर्वी शैलेंद्र शिंदे नावाच्या व्यक्तीने मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा मेल गृह विभागाला केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी चौकशी केल्यावर ही केवळ अफवा असल्याचं समजलं.
मुंबई पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. सध्या शैलेश मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. मंत्रालय बॉम्बनं उडवण्याची धमकी दिल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला अटक केली होती. यानंतर त्याच्याविरोधात मरीन ड्राईव्ह पोलिसांत गुन्हा दाखल करत त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. शैलेशनं मुलीचं शाळेत अॅडमिशन न झाल्यानं हा मेल पाठवला असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
या कारणासाठी शिंदेंनी केला धमकीचा फोन?
दरवर्षी शाळा फी वाढ करत होती त्याविरोधात शिंदे विरोध करत होते. यावरून शाळा मानसिक त्रास देत होती. शाळेच्या विरोधात गेली पाचवर्ष शिंदे यांनी तब्बल १५० हून अधीक अमेल करून शाळेच्या विरोधात तक्रार केली आणि दाद मागम्याचा प्रयत्न केला. मात्र पाच वर्षात काही प्रतिसाद मिळाला नाही. शिंदे यांचा मुलगा मागच्या वर्षी १० वी पास झाला मात्र शाळेने अजुनही अकरावीचे ऍडमीशन दिले नाही. याबाबत ही त्यांनी मेल करून दाद मागितली होती. त्यालाही शिक्षण विभागाकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी हे पाउल उचलल्याचे त्यांच्या कुटुंबुयांचे म्हणणे आहे.