TheClearNews.Com
Sunday, June 22, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नालासोपारा स्फोटक प्रकरण : एटीएसने अटक केलेल्या यावलच्या तरुणास साडेचार वर्षांनी जामीन मंजूर !

यावल-साकळीच्याच वासुदेवचा गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांच्या हत्येशी जोडला गेला होता संबंध ; जाणून घ्या...नेमकं काय होतं संपूर्ण प्रकरण !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 26, 2023
in क्रीडा, गुन्हे, यावल, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

यावल ( प्रतिनिधी) तालुक्यातील साकळी येथून सप्टेंबर २०१८ मध्ये विजय उर्फ भैव्या उखाई लोधी या तरुणास राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नालासोपारा स्फोटक प्रकरणात अटक केली होती. तेव्हापासून हा तरुण तुरुंगात होता. या तरुणास मुंबई विशेष न्यायालयाने तब्बल साडेचार वर्षांनी जामीन मंजूर केला आहे. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने प्रसिद्ध केले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण !
१० ऑगस्ट २०१८ रोजी नालासोपारा येथे एटीएसने कारवाई करून २० जिवंत बॉम्ब व बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त करत वैभव सुभाष राऊत यास अटक केली होती. ६ सप्टेंबर रोजी साकळी येथील वासुदेव भगवान सूर्यवंशी न्यास व दुसऱ्या दिवशी गावातीलच विजय उर्फ भैय्या उखाई लोधी अशा दोघांना अटक केली होती.

READ ALSO

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

नूपूर नृत्यांगणचे कथ्थक परीक्षेत यश !

साकळीतून ज्वालाग्राही पदार्थ केले जप्त
सूर्यवंशी व लोधी यांच्याकडून ज्वालाग्राही पदार्थ, पेनड्राइव्ह, मोबाइल असे साहित्य जप्त केल्याचे एटीएसने न्यायालयात सांगितले होते. एटीएसकडून न्यायालयात देण्यात अालेल्या माहितीनुसार, साकळी गावातून ताब्यात घेण्यात आलेल्या विजय ऊर्फ भय्या लोधी याच्याकडून ज्वालाग्राही पदार्थ, ३ मोबाइल, ४ पेनड्राइव्ह व दुचाकीच्या काही नंबर प्लेट जप्त करण्यात अाल्या. वासुदेव सूर्यवंशीकडून १ डीव्हीडी व २ मोबाइल जप्त केल्याचेही समोर आले होते.

एटीएसने लावले होते गंभीर आरोप !
एटीएसने १० ऑगस्ट रोजी नालासोपारा येथून काही शस्त्रे व बाॅम्ब जप्त करून वैभव राऊतला अटक केली हाेती. नंतर याच प्रकरणात शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर व अविनाश पवार यांना अटक करण्यात आली होती. तर ६ सप्टेंबर रोजी साकळी येथून वासुदेव भगवान सूर्यवंशी यास ताब्यात घेतले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी याच गावातील लोधी वाड्यातील विजय ऊर्फ भय्या उखर्डू लोधी यालाही अटक करण्यात अाली हाेती. या प्रकरणात अटक केलेल्या अाराेपींचा मुंबई, नालासोपारा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर येथे घातपाती कारवाया, बॉम्बस्फोट, विशिष्ट विचारसरणीचा प्रसार करणाऱ्या व्यक्तींच्या हत्या घडवण्याचा कट आखल्याचा आरोप एटीएसने केला होता.

सुर्यवंशीचा थेट संबध गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांच्या हत्येशी संबंध?

माध्यमांमध्ये आलेल्या बातमीनुसार वासुदेव सुर्यवंशीचा थेट संबध कर्नाटकमधील गौरी लंकेश यांच्या हत्येशी असल्याचे एटीएसच्या तपासात समोर आल्याचे सांगण्यात आले होते. सूर्यवंशी याने दिलेल्या माहितीवरून दोन कार, सहा दुचाकी एटीएसने हस्तगत केल्या आहेत. सूर्यवंशी याचा गौरी लंकेशसह नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येत सहभाग होता. याने आरोपींना वाहने पुरवली व नंतर ती वाहने नष्ट करण्यासाठी मदत केल्याचे निष्पन्न झाले आहे. गौरी लंकेश यांच्या घराची रेकी करण्यासाठी वापरलेली वाहने सुर्यवंशीने बीडमध्ये नष्ट केल्याची कबुली दिल्याचे तत्कालीन एटीएसच्या सुत्रांनी सांगितले असल्याचेही माध्यमांनी त्यावेळी म्हटले होते. तर कन्नड विचारवंत आणि लेखक एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) अमोल काळे, गणेश मिस्कीन, शरद कळसकर, प्रवीण प्रकाश चतुर, वासुदेव भगवान सूर्यवंशी व अमित रामचंद्र बड्डी अशा सहा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.

वासुदेव आणि विजयच्या एका मित्राचीही झाली होती चौकशी !

किरण मराठे या तरुणाला चार ते पाच तास चौकशी करून एटीएसच्या पथकाने साखळी गावात येऊन सोडले होते. हा तरुण हा नालासोपारा स्फोटक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या गावातील वासुदेव सूर्यवंशी व विजय उर्फ भैय्या लोधी या दोघांचा मित्र होता. त्याला जळगाव येथून पथकाने ताब्यात घेतले होते. त्याची गाडीतच सुमारे चार ते पाच तास चौकशी केली तसेच त्याच्या दोन मित्रांच्या संदर्भात काही माहिती जाणून घेतली. एटीएसच्या पथकाला तपासात आवश्यक ते सहकार्य करण्याच्या अटीवर त्याला सोडण्यात आले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

June 21, 2025
क्रीडा

नूपूर नृत्यांगणचे कथ्थक परीक्षेत यश !

June 21, 2025
क्रीडा

अन्वरीया ग्रुपने पटकावले विजेते पद

June 21, 2025
गुन्हे

पहिल्यांदाच नोकरीच्या शोधात निघाला अन् तरुणासोबत जे घडलं ते भयंकर !

June 20, 2025
एरंडोल

चारचाकी अन् दुचाकीच्या अपघात ; तरुणाचा जागीच मृत्यू

June 20, 2025
गुन्हे

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

June 19, 2025
Next Post

किनगाव येथील वृद्धाच्या खूनप्रकरणी सुनेसह दोघे अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तेजस्वी यादव सर्वात तरुण सीएम ठरतील कि नितीश कुमार

November 10, 2020

शालेय शुल्कात ५० टक्के सवलत द्या : जलील पटेल

June 24, 2021

पूजा चव्हाणच्या हत्येशी संबंधित 56 मिनिटांची सीडी आपल्याकडे ; शिवसेना नेत्याच्या गौप्यस्फोटामुळे खळबळ ! 

June 28, 2022

 फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा शपथविधी सोहळा ठरला ?

June 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group