मुंबई (वृत्तसंस्था) २०१५ मधील ‘द क्विंट’च्या एका लेखाचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. धर्मनिरपेक्षता संपली आहे, भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा, अशा मथळ्याखाली संजय राऊत यांचा उल्लेख असलेल्या लेखाचा स्क्रीनशॉट शेअर करत भाजपा आमदार नितेश राणे यांनी यावरही उत्तर द्यावं असं वाटत नाही का…मिस्टर सीएम? की नेहमीप्रमाणे हे फक्त राजकारण होतं? इतरांना दोष देण्याआधी आपल्या घरातील गोष्टी निस्तरा, असे ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे..
नितेश राणे यांनी केलेले ट्विटमध्ये त्यांनी २०१५ मधील ‘द क्विंट’च्या एका लेखाचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. “धर्मनिरपेक्षता संपली आहे, भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा” अशा मथळ्याखाली लिहिण्यात आलेल्या लेखात संजय राऊत यांचा उल्लेख आहे. त्यावर नितेश राणे यांनी ट्विटकरून यावरही उत्तर द्यावं असं वाटत नाही का…मिस्टर सीएम? की नेहमीप्रमाणे हे फक्त राजकारण होतं? इतरांना दोष देण्याआधी आपल्या घरातील गोष्टी निस्तरा, असे म्हटले आहे. दरम्यान, राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे, तो योग्यच आहे. मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचं हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही,” असं उद्धव ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.