मुंबई (वृत्तसंस्था) लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिल माफ न करता त्याची सक्तीने वसूल करा, असं भाष्य ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केल्यानंतर विरोधी पक्ष नेते आक्रमक झाले आहेत. याच मुद्यांवरून आता भाजपा नेते नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टोला लगावला आहे.
काय म्हणाले नितेश राणे
“या महाविकास आघाडी सरकारने ‘NIGHTLIFE’ जास्तच मनावर घेतले आहे असं दिसत आहे. वीजबिल इतके हातात दिले की, कोणीही भरणार नाही.. मग काय अंधारच अंधार.. आणि मग.. पेंग्विन गँगची पार्टी सुरु,” असं म्हणत नितेश राणे यांनी सरकारला टोला लगावला आहे.