धरणगाव (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून विद्यापीठाने पूर्णपणे तयारी केली असून कोणत्याही विद्यार्थ्याला कुठल्याही स्वरूपाची समस्या निर्माण झाल्यास ती समस्या सोडविण्यासाठी आपल्या विद्यापीठाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे, अशी माहिती सिनेट सदस्य दिलीप रामू पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे की, कोणताही विद्यार्थी कोणत्याही महाविद्यालयात जाऊन परीक्षा देऊ शकणार आहे. ऑफलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या गावाजवळच्या महाविद्यालयात परीक्षा देता येईल. एक हमीपत्र देऊन तो विद्यार्थी परीक्षा देऊ शकेल. दिव्यांग २७३ विद्यार्थी यावेळी परीक्षेस पात्र आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची विद्यापीठातून वैयक्तिक संपर्क केला असून गरज पडली तर अशा विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पेपरला जाईल. जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी सोय करून ठेवली असून प्रत्येक महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य आय-टी केऑर्डीनेटर्स सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी या प्रक्रियेत सहभागी आहेत. परीक्षा काळात विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींवर मार्गदर्शन करण्यासाठी ३५५ आय-टी कोऑर्डिनेटर काम करणार आहेत.
2500 विषयांची परीक्षा होणार असून अल्पावधीत आपल्याकडील प्राचार्य प्राध्यापक बंधू-भगिनींनी २५०० विषयांच्या एमसीक़्यु पद्धतीच्या प्रश्नपत्रिका व प्रश्नसंच काढून दिले आहेत. कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील सर्व यंत्रणा रात्रंदिवस काम करीत आहे. विद्यापीठाच्या प्राधिकरणाचे सर्व सदस्यही कार्यरत असून सर्व १७९ परीक्षा केंद्रांवर समन्वय साधण्यासाठी व्यासपीठ सदस्य दीपक पाटील, प्रा. मोहन पावरा, प्रा. नितीन बारी, प्रा.गौतम कुंवर, प्रा अनिल पाटील, प्रा. के.जी कोल्हे, प्रा.आहिरराव, प्रा. गोसावी, विष्णू भंगाळे, अमोल सोनवणे, अमोल मराठे, अमोल पाटील, दिनेश नाईक, मनीषा खडके, प्रा. प्रज्ञा जंगले, नितीन ठाकूर इत्यादींच्या समित्या घोषित केलेल्या आहेत.
५३५५४ विद्यार्थिनी परीक्षेला बसणार आहेत. ३९,००० विद्यार्थिनी ऑनलाईन तर उर्वरित ऑफलाईन देतील विद्यार्थी जेव्हा लॉगिन होईल तेव्हा पासून दोन तास विंडो पिरियड व ९० मिनिटे परीक्षेसाठी मिळतील. त्यासाठी विद्यार्थिनींची लगेच परीक्षा घेतली जाईल. कोणीही विद्यार्थी परीक्षेत शिवाय राहणार नाही. या परीक्षेचा निकाल लगेच लागावेत म्हणून विद्यापीठाने तयारी केली आहे. सर्व विद्यार्थिनी तणाव परीक्षा द्यावी. काही अडचण आल्यास प्रा. आय -टी समन्वयक यांच्याशी संपर्क करावा. विद्यापीठ यंत्रणातील कुलगुरू ,प्र-कुलगुरू सचिव परीक्षा नियंत्रक ओ.एस.डी व्यासपीठ सदस्य अधिष्ठता अधिसभा विशेष सभा सदस्य यांच्याशी संपर्क करता येईल, असे आवाहन व्यासपीठ सदस्य दिलीप रामू पाटील यांनी केले आहे.