सातारा (वृत्तसंस्था) खासदार उदयनराजे भोसले यांनी आता काही तासातच पुन्हा वेगळी भुमिका घेत आम्ही विष पिणार नाही तर पाजणार असल्याची धमकी सत्ताधाऱ्यांना दिली. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने भाजपचे नेते खासदार उदयनराजे भोसले हे काही दिवसांपासून चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. सत्तेत बसणारे ज्या भावनेने निवडून त्या भावनेला त्यांनी न्याय द्यावा. हे राजकारण नाही तर गचकरण झाले आहे. असे उदयनराजे म्हणाले. ते साताऱ्यात बोलत होते.
आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाजामध्ये मोठी अस्वस्थता आहे. आरक्षणाला घेऊन विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला आहे. आता याच मुद्द्यावर बोलताना आता मी विष पिणार नाही, आता यांना विष पाजणार अशा कठोर शब्दात भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला. मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन उदयनराजे भोसले यांनी राज्यातील विविध नेत्यांना भेटी दिल्या. त्यांनी या भेटीत मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला. मात्र, या भेटींविषयी बोलताना त्यांनी या भेटीचा काही उपयोग झाला नसल्याचे म्हणत नाराजी व्यक्त केली. “मराठा आऱक्षणाच्या संदर्भात राज्यसरकारची माणस कोर्टात हजर होत नाहीत. राज्य सरकारने काय दिवे लावले ते लोकांना कळायला पाहिजे. राज्य सरकारने श्वेतपत्रिका आणावी. जगात जात नसती तर भांडण झाले नसते. सगळे एकत्र राहिले असते. ते आता एकमेकाशी बोलत नाहीत. मी अनेक नेत्यांना भेटलो पण त्याचा उपयोग झाला नाही असे वाटते,” असे उदयनराजे म्हणाले.
शरद पवार, अजित पवार, यांच्या मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांच्या गाठी भेटी घेऊन त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी आपले म्हणणे मांडले होते. काल ते साताऱ्यात आल्यानंतर त्यांनी एका पत्रकातून मराठा समाजाला आरक्षण मिळत नसेल तर आम्हाला विष पिऊद्या असे सांगितले होते. आज मात्र उदयनराजेंनी सत्ताधाऱ्यांना विष पाजणार असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी अजित पवारांना खुप कळते तर त्यांनी श्वेत पत्रीका सादर कावी अशी मागणी करत मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर मराठा समाज आक्रमक होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.