TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘तिसरं विश्वयुद्ध झाल्यास अणवस्त्रांचा वापर होईल’ ; रशियाचं वक्तव्य

जाणून घ्या..अणुयुद्ध झाल्यास काय-काय होतील परिणाम !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 2, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी एक सूचक विधान केलं आहे. लावरोव्ह यांनी बुधवारी तिसरं विश्वयुद्ध झालं तर ते नक्कीच अण्विक असेल असं म्हटलंय. “तिसरं विश्वयुद्ध झाल्यास त्यामध्ये अणवस्त्रांचा वापर होईल आणि ते फार विद्धवंसक असेल,” असं लावरोव्ह यांनी म्हंटलंय. त्यामुळे आजच्या आधुनिक जगात अणुयुद्ध झाल्यास काय होईल?, असा प्रश्न पडलास काय होईल.

अण्वस्त्र सतर्कतेचे पुतिन यांचे आदेश

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे पाश्चिमात्य देशांचा दबाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी २७ फेब्रुवारी रोजी अण्वस्त्र दलास सतर्क राहण्याचे आदेश दिले. नाटो देशांच्या आक्रमक विधानांमुळे आपण हे आदेश दिल्याचे समर्थनही पुतिन यांनी केले. पुतिन यांनी अण्वस्त्र सतर्कतेचे आदेश देताना केवळ ‘नाटो’ देशांच्या कथित विधानांचाच नाही, तर पाश्चिमात्य देशांनी रशियावर लादलेल्या कठोर आर्थिक निर्बंधांचाही उल्लेख केला.

युद्धस्थिती काय?

रशियन सैन्याकडून हल्लासत्र तीव़ करण्यात आला असून मंगळवारपासून खार्कीव्हमध्ये तोफांचा मारा केला जातोय. या ठिकाणी गोळीबारात मोठी जिवीतहानी़ झाली आहे. किव्हमध्ये ६० किमीपर्यंत रणगाड्यांचा ताफा़ सॅटेलाइट फोटोंमध्ये दिसून आलाय. किव्ह शहरात आणखी लक्ष्यभेदी हल्ल्यांचा इशारा रशियाने दिलाय. रशियाने तातडीने हे शहर सोडण्याचं आवाहन केलंय. रशियाने या शहरातील सर्व नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याची सूचना़ केलीय. युक्रेनमधून आतापर्यंत ६ लाख ७७ हजार नागरिकांचे शेजारच्या देशांत स्थलांतर केलं आहे. युरोप युक्रेनबरोबर आहे, हे सिद्ध करण्याचे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांचे युरोपीय संसदेतील भाषणात आवाहन केलं आहे.

रशियाकडे किती अणु बॉम्ब?

रशियाकडे विविध क्षमतेचे अणु बॉम्ब आहेत. म्हणजे हिरोशिमा -नागासाकी वर टाकलेल्या अणु बॉम्बच्या संहारक शक्तीपेक्षा हजारपट शक्तीशाली अणुबॉम्ब रशियाकडे आहेत. गेल्या अनेक वर्षातले संशोधन आणि विविध प्रयोगांच्या माध्यमातून एखाद्या मोठ्या बॅगेत सहज राहील अशा आकाराचे, किरणोत्साराचे उत्सर्जन जास्त पण उष्णतेमुळे विध्वंस कमी होईल अशा प्रकारचे अणु बॉम्बही विकसित करण्यात आले आहेत. तेव्हा असेही अणु बॉम्ब रशियाकडे असावेत असा अंदाज आहे. एका अंदाजानुसार रशियाकडे सहा हजारांहून अधिक अणु बॉम्ब आहेत.

अणु बॉम्ब टाकण्यासाठीची सज्जता किती?

रशियाकडे १०० किलोमीटरपासून ते अगदी १० हजार किलोमीटरपेक्षा कितीतरी जास्त अंतरावर अचूक मारा करण्याची क्षमता असलेली विविध क्षेपणास्त्रे आहेत. ही क्षेपणास्त्रे एकाच वेळी विविध क्षमेतेचे अणु बॉम्ब वाहून नेऊ शकतात. गरज पडल्यास शत्रू प्रदेशातल्या भागात घुसत अणु बॉम्ब टाकणारी खास लढाऊ विमाने तसंच टीयू-१६० सारखी बॉम्बफेकी विमाने रशियाकडे आहेत. एवढंच नाही तर शत्रु हल्लाच्या पहिल्याच तडाख्यात जमिनीवरील प्रहार क्षमता नष्ट झाली तर पाण्याखालून क्षेपणास्त्र डागत हल्ला करु शकणाऱ्या विविध अणु पाणबुड्या रशियाकडे आहेत.

अणुयुद्ध झाले तर काय होईल?

द इंटरनॅशनल कॅम्पेन टू अबॉलिश न्यूक्लियर वेपन (ICAN) ही स्वित्झर्लंडमधील संस्था आहे. या संस्थेला 2017 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कारही मिळाला आहे. ICAN च्या मते, एक अणुबॉम्ब एका झटक्यात लाखो लोकांचा बळी घेईल. त्याच वेळी, जर 10 किंवा शेकडो बॉम्ब पडले, तर लाखो मृत्यू तर होतीलच पण पृथ्वीची संपूर्ण हवामान व्यवस्था बिघडेल.

कोट्यवधी लोकांचे मृत्यू होतील

ICAN च्या मते, एक अणुबॉम्ब संपूर्ण शहर नष्ट करेल. आजच्या काळात अनेक अण्वस्त्रे वापरली गेली तर त्यात करोडो लोक मारले जातील. त्याचवेळी, अमेरिका आणि रशियामध्ये मोठे अणुयुद्ध झाले तर मृतांचा आकडा 10 कोटींचा देखील पुढे असेल. मुंबई, जिथे प्रत्येक एक किलोमीटरच्या परिघात 1 लाखांहून अधिक लोक राहतात, तिथे हिरोशिमासारखा अणुबॉम्ब पडला तर आठवडाभरात 8.70 लाखांहून अधिक मृत्यू होतील. अमेरिका आणि रशिया यांच्यातील अणुयुद्धात 500 अणुबॉम्ब वापरल्यास अर्ध्या तासात 10 कोटींहून अधिक लोक मारले जातील. एवढेच नाही तर जगात सध्या 1% पेक्षा कमी अण्वस्त्रे युद्धात वापरली गेली तरी 2 अब्ज लोक उपासमारीच्या उंबरठ्यावर येतील. यासोबतच संपूर्ण आरोग्य यंत्रणाही उद्ध्वस्त होईल, त्यामुळे जखमींना उपचार देखील मिळू शकणार नाहीत.

संपूर्ण पृथ्वीची व्यवस्था विस्कळीत होईल

हिरोशिमावर जो अणुबॉम्ब टाकण्यात आला होता, त्याच आकाराचे जर 100 बॉम्ब टाकण्यात आले तर पृथ्वीची संपूर्ण व्यवस्था बिघडेल. अशा हल्ल्यामुळे हवामान व्यवस्थेवर वाईट परिणाम होऊन शेतीही नष्ट होईल. सध्या जग ग्लोबल वॉर्मिंगशी झुंजत आहे, पण अणुयुद्धामुळे पृथ्वीचे तापमान झपाट्याने कमी होऊ लागेल. कारण या हल्ल्यांमुळे इतका धूर निघेल की पृथ्वीच्या पृष्ठभाग गोठून जाईल. असा अंदाज आहे की जेव्हा असं काही घडेल तेव्हा किमान 10% ठिकाणी सूर्यप्रकाश पोहचू शकणार नाही.

त्याच वेळी, जर जगभरातील सर्व अण्वस्त्रे वापरली गेली, तर पृथ्वीच्या स्ट्रॅटोस्फियरमध्ये 150 मिलियन टन धूर गोठेल. स्ट्रॅटोस्फियर हा पृथ्वीचा बाह्य पृष्ठभाग आहे जो ओझोन थराच्या वर आहे. एवढेच नाही तर जगातील बहुतांश भागात पाऊस पडणार नाही. जागतिक पर्जन्यमान 45% ने कमी होईल आणि यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान -7 ते -8 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. याची तुलना केल्यास 18 हजार वर्षांपूर्वी जेव्हा हिमयुग होतं तेव्हा तापमान -5 डिग्री सेल्सियस होते. म्हणजेच जग 18 हजार वर्षे मागे जाईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

कृषी वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी उरला केवळ एक महिना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा बँक निवडणूक : भाजपचे सर्व उमेदवार माघारी, बँकेवर ‘मविआ’चे वर्चस्व स्पष्ट

November 8, 2021

चाळीसगाव : अल्पवयीन मुलांना खोली देणार्‍या दोघा महिलांना बेड्या !

August 2, 2023

जीवन सुरक्षा विमा योजनेसाठी माजी सैनिकांनी माहिती पाठविण्याचे आवाहन

September 8, 2020

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सरकारने नाही तर एका भाजपा मंत्र्याचा त्रास : डॉ. तात्याराव लहाने

February 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group