जळगाव (प्रतिनिधी) शहरातील आज दि. ३ नोव्हेंबर रोजी ‘पत्रकार भवन’ येथे सकाळी 11:00 वा. वंचित बहुजन आघाडीतर्फे भव्य, ओ. बी. सी. कार्यकर्ता पक्ष प्रवेश सोहळा आणि जिल्हा कार्यकर्ता संवाद मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री.अॅड.धनराज वंजारी साहेब यांचे अनमोल मार्गदर्शन कार्यकर्त्यांना लाभले. सदर कार्यक्रमाचे आयोजन विनोद सोनवणे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आणि प्रमोद इंगळे जिल्हाध्यक्ष भारिप बहुजन महासंघ या दोन्ही जिल्हाध्यक्ष यांचे नेतृत्वात करण्यात आले होते.तसेच पक्षाचे युवा आघाडी राज्य सदस्य शामिभाताई पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली होती.
या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना धनराज वंजारी यांनी सांगितले की, मागील काळात केलेली नोटबंदी आणि आताचा कोरोना हे मनुवादी अन् जातीयवादीशक्तींनी आखलेले षडयंत्र आहे, या तुन तमाम बहुजन समाजाला आर्थिक दृष्ट्या पंगू, कमकुवत करण्याचा कुटील डाव आहे. एकदा कि तुम्ही त्यात अडकले की रोजी रोटीच्या शोधातच तुम्ही गुरफटून जाल म्हणून हा डाव असफल झाला पाहिजे तुम्ही सावध रहावे नाही तर येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही, असे ठोस पणे सांगितले.
सदर प्रसंगी अनेक ओ.बी. सी.बांधव आणि भगिनींनी पक्ष प्रवेश केला त्या सर्वांचे विनोद सोनवणे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी,प्रमोद इंगळे जिल्हाध्यक्ष भारिप बहुजन महासंघ आणि शमिभा ताई पाटील प्रदेश युवा सदस्य,दिनेश इखारे जिल्हा महासचिव, वंदनाताई सोनवणे जिल्हा महासचिव, संगिताताई भामरे जिल्हा उपाध्यक्षा, सुजाताताई ठाकुर जिल्हाध्यक्षा महिला आघाडी यांनी पक्षाचे मफलर देवून सत्कार केला.
कार्यक्रमास दिनेश इखारे जिल्हा महासचिव, महेंद्र सुरडकर जिल्हा उपाध्यक्ष,रफिक बेग, डिगंबर सोनवणे, अरुण नरवाडे जिल्हा कोषाध्यक्ष, मुबारक पठाण वंचित बहुजन कंत्राटदार संघटना महाराष्ट्र, प्रकाश सरदार,अरुण तायडे जिल्हा सदस्य,गमिर शेख, सुजाताताई ठाकुर महिला आघाडी जिल्हाध्यक्षा, बाळा पवार, सुपडा निकम बोदवड, बालाजी पठाडे भुसावळ,सचिन सुरवाडे जामनेर, भिकाजी असलकर मुक्ताईनगर, बाळासाहेब पाटील एरंडोल, सुनिल ठाकुर भुसावळ, वंदनाताई सोनवणे जिल्हा महासचिव महिला आघाडी, संगिताताई भामरे जिल्हा उपाध्यक्षा महिला आघाडी, देवदत्त मकासरे (मेजर), शिवाजीराव टेंभुर्णीकर, विद्यासागर खरात,सचिन वानखेडे, प्रमोद बावस्कर,गणेश महाले, सुमित सोनवणे, जितेंद्र केदार, राहुल सुरवाडे,अण्णा मोरे भडगाव,रुपेश साळुंके भुसावळ, बबन कांबळे, स्वप्नील सोनवणे, राजु इंगळे, विनोद लोखंडे, सुरेश सुरवाडे आदी उपस्थित होते.