टोकयो (वृत्तसंस्था) टोकयो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताची अनुभवी खेळाडू मीराबाई चानूनं इतिहास रचला आहे. टोकयो ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टर मीराबाई चानूनं रौप्य पदकावर नाव कोरलं. महिलांच्या ४९ वजनी गटात मीराबाई ने स्नॅच प्रकारात ८७ तर क्लीन अँड जर्क प्रकारात ११५ किलो वजन उचललं.
मीराबाई चानूनं इतिहास रचला आहे. तिने ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेलं हे पहिलं पदक आहे. चानूनं स्नॅच गटातील पहिल्या प्रयत्नात ८४ किलो वजन यशस्वी उचलले. दुसऱ्या प्रयत्नात ८७ किलो यशस्वी वजन उचलल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात ८९ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यानंतर क्लीन अँड जर्क गटामध्ये तिने जोरदार कामगिरी करत पदक जिंकले.
चानू यावेळी ४९ किलो वजनी गटामध्ये सहभागी झाली होती. पाच वर्षांपूर्वी रिओमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्येही माीराबाईकडून पदकाची मोठी अपेक्षा होती. त्या ऑलिम्पिकमध्ये मीराबाईनं निराश केलं होतं. त्या स्पर्धेत तिला सहा प्रयत्नात फक्त एकच वेळी वजन उचलण्यात यश मिळाले होते.















