धरणगाव (प्रतिनिधी) चैत्र शुक्ल प्रतिपदा श्री शालीवाहन अर्थात गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षाप्रमाणे यंदा ही धरणगाव शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे.
या वर्षी २२ मार्चला सकाळी ७ वाजता मिरवणुकीला प्रारंभ होईल. यासाठी गावातील सर्व सामाजिक संघटना, शाळा, महाविद्यालये, क्रीडा मंडळ, लेझीम मंडळ, महिला मंडळ, कीर्तनकार, भजनी मंडळ तसेच सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. ही मिरवणूक श्री बालाजी मंदिर, धरणी चौक, बाजार पेठ, कोट बाजार, श्रीराम मंदिर, परिहार चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, बस स्थानक, अर्बन बँक, अहिल्याबाई होळकर चौक, नेताजी रोड, धरणी पुल, मराठे गल्ली, बजरंग चौक, वाणी गल्ली या मार्गे श्री बालाजी मंदिरात येईल. येथे आरती झाल्यानंतर प्रसाद वाटप करून मिरवणुकीची सांगता केली जाईल. मिरवणुकीला उपस्थित रहावे, असे वहन व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष डी. आर. पाटील, उपाध्यक्ष गुलाबराव वाघ, संचालकांनी कळवले आहे.