नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओ देखील आता कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांनी रिलायन्स जिओचे सिम कार्ड जाळून निर्देशने केले होते. त्यानंतर आता हेच आंदोलक पंजाब आणि हरियाणातील जिओचा टॉवरची वीजही तोडत आहेत. मात्र, या संदर्भात रिलायन्स जिओ कडून कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
शेतकरी आंदोलनामुळे रिलायन्स जिओचे आव्हान वाढले आहे. काही दिवसांपूर्वी रिलायन्स जिओने आपल्या प्रतिस्पर्धक कंपन्या भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया लि. (व्हीआयएल) वर शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही केला होता. एअरटेल आणि व्हीआयएल दावा करत आहेत, की जिओचा मोबाईल नंबर त्यांच्या नेटवर्कवर पोर्ट करणे, हे शेतकरी आंदोलनाला समर्थन असेल. नवे मोबाईल ग्राहक जोडण्याच्या बाबतीत सुनील मित्तल यांच्या एअरटेलने रिलायन्स जिओला मागे टाकले आहे. रिलायन्स जिओ मागे पडण्याचा हा सलग दुसरा महिना आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यातही एअरटेलने किमान चार वर्षांनंतर नव्या कनेक्शन्सच्या बाबतीत जिओला मागे टाकले होते. ट्रायच्या अहवालानुसार, सुनील भारती मित्तल यांच्या कंपनीने ऑक्टोबर महिन्यात ३६.७ लाख ग्राहकांना जोडले होते. यामुळे त्यांच्या मोबाईल कनेक्शन्सची संख्या वाढून ३३.०२ कोटींवर पोहोचली आहे. यानंतर जिओने २२.२ लाख नवे मोबाईल ग्राहक जोडले. त्यांच्या कनेक्शन्सची संख्या ४०.६३ कोटी झाली आहे. महत्वाचे म्हणजे जिओ २०२१मध्ये ५जी टेक्नॉलॉजीमध्ये येण्याचा विचार करत असतानाच त्यांच्यासोबत हे सर्व घडत आहे.
दरम्यान हा जिओला आणखी एक दुसरा झटका बसला आहे. नवीन मोबाईल ग्राहक जोडण्याच्या बाबतीत सुनील मित्तल यांच्या एअरटेलने रिलायन्स जिओला मागे टाकले आहे. रिलायन्स जिओ मांगे पडण्याचा हा सलग दुसरा महिना आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यातही एअरटेल किमान चार वर्षांनंतर नव्या कनेक्शनच्या बाबतीत जिओला मागे टाकले होते.