जळगाव (प्रतिनिधी) मराठी साहित्यात मोलाची भर घालणाऱ्या २०२१ साली २०२१ कवींच्या २०२१ कवितांचा ‘महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ या महाकाव्यग्रंथाचे प्रकाशन आज कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रभारी प्रकुलगुरू डॉ. बी. व्ही. पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यापीठाचे मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. म. सु. पगारे, जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग प्रमुख डॉ. सुधीर भटकर,मराठी अभ्यास मंडळ अध्यक्ष डॉ. आशुतोष पाटील, ग्रंथालय संचालक डॉ. अनिल चिकाटे, मराठी अभ्यास मंडळ सदस्य म्हणून डॉ. संजीवकुमार सोनवणे उपस्थितीत झाले.
आज महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात एकाच दिवशी या महाग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. नांदेड येथील साहित्यिक तथा या ग्रंथाचे संपादक अशोककुमार दवणे यांनी दोन वर्षाच्या परिश्रमातून या महाग्रंथाची निर्मिती केली असून यात देशभरातील तब्बल दोन हजार एकवीस कवींच्या दोन हजार एकवीस कवितांचा समावेश करण्यात आला आहे. लवकरच या महाग्रंथाचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे.