चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यात पावसाने थैमान घातले असून अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झालीय. त्यामुळे जवळपास ५०० ते ६०० जनावरे तसेच काही लोकं वाहून गेल्याची वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. पुरामुळे तालुक्यात मोठं नुकसान झाल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी माध्यमांना दिली आहे.
तालुक्यात जवळपास पंधरा गावांमध्ये पाणी शिरंल आहे. तसेच जणावरे वाहून गेल्याच्या वृत्ताला प्रशासनाने दुजोरा दिला आहे. आमदार मंगेश चव्हाण म्हणाले, स्थानिक लोकांशी माझं बोलणं झाल आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत आम्ही घाटात आहोत. या ठीकाणी मोठ्या दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे रस्ता मोकळा करण्याचे काम सुरु आहे. ५०० ते ६०० गुरं पाण्यामध्ये वाहून गेली आहेत. तर काही दगावली आहेत. तसेच सकाळपासून ३ ते ४ मृतदेह मी बघितले आहेत. त्यामुळे ८ ते १० लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व प्रशासन कामाला लागलं आहे. या पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. पंचनामे केल्यानंतर ते कळेल. पंचनामे करण्याच्या सुचना महसूल विभागाला केल्या आहेत. तालुक्यातील ८ ते १० गावांना या पुराचा फटका बसला आहे