मुंबई (वृत्तसंस्था) बंडखोर आमदारांमुळे पक्षाची मोठी हानी झाली आहे. पक्षाची नुकसान भरुन काढण्यासाठी पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसह रश्मी ठाकरे ह्या देखील पक्षाला सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. जो-तो आपआपल्या पध्दतीने पक्ष सावरण्यासाठी आणि वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र आहे.
शिवसेनेतील बंडखोर आमदारांमुळे पक्ष आणि सरकार हे दोन्हीही संकटात आहे. याबद्दलची अधिक माहिती रश्मी ठाकरे ह्या बंडखोर आमदारांच्या पत्नींना देत असून त्यांनी हे बंड थंड करण्याबाबत राजी करावे अशा प्रकारचा संवाद त्या फोनवरुन करीत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत.
आदित्य ठाकरे आता मैदानात उतरुन पदाधिकाऱ्यांचे मेळावे आणि विविध कार्यक्रमा्ला हजर राहत आहेत. असे असताना रश्मी ठाकरे या देखील मागे राहिलेल्या नाहीत. त्यांनी बंडखोर आमदारांच्या पत्नींना फोन करुन हे बंड थंड करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नानंतर आता रश्मी ठाकरे यांचे प्रयत्न कितपत यशस्वी होतील?, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.