धरणगाव (प्रतिनिधी) आज (दि. 27 ऑक्टोबर), मंगळवार अश्विन शुद्ध एकादशी या दिवशी निघणारा श्री. बालाजी रथोत्सव यावर्षी स्थगित केला आहे. रथोत्सवाची परंपरा अखंड चालू राहावी म्हणून रथाची यथासांग पूजा केली गेली. तसेच श्री बालाजी भगवानांना रथावर विराजमान करण्यात आले.
जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील. नगराध्यक्ष निलेश चौधरी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, नायब तहसीलदार प्रथमेश मोहळ, मुख्याधिकारी जनार्दन पवार व पी. आय. पवनकुमार देसले यांच्या हस्ते मंदिर प्रांगणात आरती करण्यात आली. त्यानंतर रथ 10 फूट ओढला गेला व लगेच पूर्ववत जागेवर आणला. यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुरक्षित अंतर, मास्कचा वापर व सॅनिटायजेशन या गोष्टी कटाक्षाने पाळल्या. रथाची सजावट, रोषणाई करून, जागेवर भाविकांच्या दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली. भाविक भक्तांनी सर्व नियमांचे पालन करून आपले श्रद्धास्थान श्री बालाजी भगवानांचा दर्शनाचा लाभ घेतला. मंडळाचे अध्यक्ष प्रा.डी. आर. पाटील सर, उपाध्यक्ष श्री गुलाबराव वाघ, जीर्णोद्धार समिती प्रमुख जीवन सिंह बयस, सचिव राजेंद्र पवार, सहसचिव प्रशांत वाणी, अशोक येवले व मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. गावातील सर्व पक्षीय नेते, सर्व समाजातील प्रतिष्ठित उपस्थित होते. कांतीलाल पुराणिक, गणेश पुराणिक यांनी पूजा संपन्न केली.