जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून आज प्राप्त झालेल्या रूग्णांची आकडेवारीनुसार जिल्ह्यात २८२ कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेत तर ५०५ रूग्णांनी कोरोनावर मात करुन सुखरुप घरी परतले आहे. जिल्ह्यात बाधितांचा आकडा ५० हजार २२२ रूग्ण इतका झाला आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर -७३ जळगाव ग्रामीण-५, भुसावळ-३१, अमळनेर-१५, चोपडा-४०, पाचोरा-४, भडगाव-३, धरणगाव-२, यावल-५, एरंडोल-१, जामनेर-७०, रावेर-९, पारोळा-४, चाळीसगाव-१३, मुक्ताईनगर-६, बोदवड-१ आणि अन्य जिल्हा ० असे एकुण २८२ रूग्ण आज आढळून आले आहे. जिल्ह्यात एकुण ५० हजार २२२ रूग्ण आढळून आले असून ४५ हजार ३१० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज २ रूग्णांचा मृत्यू झाला असून एकुण जिल्ह्यात १२११ रूग्णांची मृत्यूचा आकडा पोहचला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.