TheClearNews.Com
Sunday, November 2, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आचारसंहिता शिथिल करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्या : रोहिणीताई खडसे !

vijay waghmare by vijay waghmare
May 26, 2024
in कृषी, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) शनिवारी सायंकाळी मुक्ताईनगर,रावेर, बोदवड तालुक्यात आलेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसाने केळीच्या बागा भुईसपाट झाल्या असून शेती शिवार आणि घरांचे, जनावरांच्या गोठ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आज रविवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांनी बोदवड तालुक्यातील शिरसाळा,चिचखेडा सिम, लहान मनुर,ऐनगाव चिखली येथे नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकरी, नागरिकांना धिर दिला. नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्या संबंधी प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या सोबत चर्चा केली. तसेच आचारसंहिता शिथिल करून नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या जळगाव जिल्हयात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला असताना काल अचानक आलेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसाने मुक्ताईनगर ,रावेर, बोदवड तालुक्यात शेती शिवार घरे व गोठयांचे मोठे नुकसान झाले आहे. मार्च महिन्यात झालेले वादळ अवकाळी पाऊस, एप्रिल मे महिन्यातील उष्ण तापमानामुळे केळी बागांची हानी होऊन केळीच्या दरात मोठी घसरण झाल्याने आधीच प्रचंड नुकसान सोसत असलेल्या शेतकऱ्यांसमोर काल झालेल्या वादळ आणि अवकाळी पाऊस या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. केळीसारख्या पिकावर मोठ्या प्रमाणात खर्च करून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले हे पीक क्षणार्धात डोळ्यांसमोर जमिनदोस्त होताना शेतकरी बांधवाना पाहावे लागले यामुळे शेतकरी बांधव हतबल झाले आहेत. तसेच अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेल्यामुळे व घरांची पडझड झाल्यामुळे संसारपयोगी साहित्याचे नुकसान होऊन संसार उघड्यावर पडले आहेत.

READ ALSO

धरणगाव तालुक्यात खरीप जमीनदोस्त !

शेतकऱ्यांना पीक विम्याचा अद्यापही लाभ नाही ; केळी पीक विमा योजनेबाबत खडसेंनी केली मागणी !

जनावरांच्या गोठ्यावरील पत्रे उडून गोठ्यात साठवण केलेला चारा भिजल्याने शेतकरी बांधवांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे चिचखेडा सिम येथे वादळाने कडुनिंबाचे झाड उन्मळून जनावरांच्या गोठ्यावर पडल्याने बाळू पाटिल यांच्या बैलजोडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे विद्युत तारा तुटून गोठ्याला आग लागल्याने शेतीपयोगी साहित्य जळून राख झाले आहे. खरिप हंगाम तोंडावर आलेला असुन या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले आहे या नुकसानीची पाहणी करून प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्या सोबत संपर्क साधुन नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदतीचे प्रस्ताव सादर करण्याबाबत तसेच विमा कंपन्यांना निर्देश देण्याबाबत चर्चा केली. तसेच सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असुन आचारसंहिता शिथिल करून नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना खरिपाच्या तोंडावर तात्काळ मदत मिळावी यासाठी निवडणूक आयोग आणि सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याचे रोहिणीताई खडसे यांनी सांगितले.

यावेळी रामदास पाटील,कैलास चौधरी चिचखेडा सिम सरपंच पांडुरंग पाटिल, सुभाष पाटिल, विनोद कोळी,रामराव पाटील, किरण वंजारी, शाम सोनवणे, नईम बागवान,अतुल पाटिल,दिलीप पाटिल,शिरसाळा सरपंच शांताराम बोरसे, प्रवीण पाटील,अमोल बोरसे,प्रकाश पाटील, दीपक किनगे, महेंद्र बोंडे, आकाश प्रकाश पाटील, राजू फिरके, सुरेश तिडके,पराग फिरके, प्रबोध पाटील, मनुर सरपंच अमोल हळपे, सुरेश धनगर चिखली सरपंच धनराज पाटील, अमोल सोनवणे,विकास पाटील,प्रकाश वाघ,लीना वाघ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: BodwadframarnuksanRohini khadse

Related Posts

कृषी

धरणगाव तालुक्यात खरीप जमीनदोस्त !

September 29, 2025
कृषी

शेतकऱ्यांना पीक विम्याचा अद्यापही लाभ नाही ; केळी पीक विमा योजनेबाबत खडसेंनी केली मागणी !

September 21, 2025
कृषी

शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी, दिलासा : ३० सप्टेंबरपर्यंत ज्वारी खरेदीस मुदतवाढ – पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांचे आवाहन

September 20, 2025
कृषी

सततच्या पावसाने कापसाला सर्वाधिक फटका ; शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले !

September 17, 2025
कृषी

केळी कापूस उत्पादकांचा 17 सप्टेंबरला जळगाव शहरात जन आक्रोश मोर्चा:

September 16, 2025
कृषी

शेतकऱ्यांनी वेळेत ई-पिक पाहणी पूर्ण करावी – पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांचे आवाहन

August 28, 2025
Next Post

प्रताप विद्या मंदिरचे रोहन पाटील यांनी पूर्ण केले एन.सी.सी.अधिकारीपदाचे प्रशिक्षण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

टिटवी येथील शेतातून मोटारसायकल चोरीला

September 16, 2020

राहुल गांधींनी हार्दिक पटेलांची नाराजी केली दूर अन् नेत्यांनाही दिला चाप

May 11, 2022

देशात गेल्या २४ तासांत आढळले १,३४,१५४ कोरोनाबधित, २८८७ रुग्णांचा मृत्यु

June 3, 2021

नशिराबाद न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळेत पालक शिक्षक सभा उत्साहात !

July 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group