भुसावळ (प्रतिनिधी) अलिकडे जाणून बुजून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र भांडण (conflict) करायला कोणताही धर्म (Religion) शिकवत नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले. मायनॉरिटी वेल्फेअर सोसायटीतर्फे आयोजित इफ्तार पार्टीत ते बोलत होते.
खडसे यांचे खास सहकारी रऊफ खान हे उसामा उर्दू हायस्कूलच्या प्रांगणात दरवर्षी रमजानमध्ये मोठ्या प्रमाणात इफ्तार पार्टीचे आयोजन करायचे. त्या पार्टीला खडसे आवर्जून उपस्थित राहात होते. सहा वर्षांपूर्वी रऊफ खान यांचे अचानक निधन झाल्याने ही परंपरा खंडित झाली होती. त्यांचा मुलगा उसामा खान यांनी ही परंपरा पुन्हा सुरू केल्याबद्दल त्यांचे खडसे यांनी कौतुक केले.
खडसे म्हणाले की, या प्रांगणातील इफ्तार पार्टी म्हटले की रऊफ खान यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांनी चांगली परंपरा सुरू केली होती. मुळात आपल्या शहरातील लोक एकोप्याने राहतात, पण काही लोक माथी भडकविण्याचे काम करतात. आपण संयम सोडू नये. रोजा संयम पाळायला शिकवतो. कायदे व नियम सगळ्यांनी पाळणे आवश्यक आहे, असे खडसे म्हणाले.