TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : हॅकिंगद्वारे भारतातील मंत्री, पत्रकार, न्यायमूर्ती यांच्यावर पाळत !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 19, 2021
in राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतासह जगभरातील अनेक देशांची सरकारे राष्ट्रीय सुरक्षेशी काहीही संबंध नसतानाही हेरगिरीच्या साधनांचा कसा वापर करू शकतात, हे द वायर आणि सहकारी माध्यम संस्थांनी केलेल्या संयुक्त आंतरराष्ट्रीय शोधपत्रकारितेतून समोर आले आहे. हॅकिंगद्वारे भारतातील मंत्री, पत्रकार, न्यायमूर्ती आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर पाळत ठेवण्यासाठी त्यांचे फोन हॅक करण्यात आले असण्याची शक्यता या माध्यम संस्थांच्या ‘प्रोजेक्ट पिगॅसस’मध्ये व्यक्त करण्यात आली आहे.

इस्रायली कंपनीच्या विविध सरकारी ग्राहकांनी पाळत ठेवण्यासाठी वापरलेल्या जगभरातील हजारो फोन नंबरच्या रेकॉर्डच्या द वायर आणि सहकारी माध्यम संस्थांनी केलेल्या पडताळणीत हे उघड झाले आहे, की २०१७ आणि २०१९ दरम्यान एका अज्ञात भारतीय एजन्सीने पाळत ठेवण्यासाठी ४० भारतीय पत्रकारांची निवड केली होती. उघड झालेल्या माहितीनुसार हे स्पष्ट होत आहे, की हिंदुस्तान टाइम्सचे संपादक शिशिर गुप्ता यांच्यासह इंडिया टुडे, नेटवर्क १८, द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस यांसारख्या भारतातील मोठ्या माध्यम संस्थांचे पत्रकार हॅकिंगसाठी निशाण्यावर होते.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

यांमध्ये द वायरच्या दोन संस्थापक संपादकांसह तीन पत्रकार, दोन नियमीत लेखकांची नावे आहेत. यामध्ये रोहिणी सिंग यांचे नाव आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या उद्योगाविषयी, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे व्यावसायिक निखिल मर्चेंट आणि बडे प्रस्थ असणारे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या उद्योगपती अजय पिरामल यांच्याबरोबर झालेल्या व्यवहारांच्या बातम्या दिल्यानंतर रोहिणी सिंग यांना टार्गेट करण्यात आले होते. इंडियन एक्सप्रेसमध्ये सह संपादक असणारे एक अन्य पत्रकार सुशांत सिंग यांच्यवर लक्ष ठेवण्यात आले होते. ते २०१८ मध्ये फ्रान्समध्ये झालेल्या राफेल व्यवहारांची तपासणी करीत होते.

लिस्टमध्ये सामील असणारे बहुतांशी पत्रकार राजधानी दिल्लीतील असून, मोठ्या संस्थांशी संबंधीत आहेत. ज्यामध्ये हिंदुस्तान टाइम्स समूहातील सध्याच्या चार आणि एका माजी पत्रकारावर पिगॅससच्या भारतातील ग्राहकाने नजर ठेवली होती. यामध्ये कार्यकारी संपादक शिशिर गुप्ता, संपादकीय पानाचे संपादक आणि माजी ब्यूरो चीफ प्रशांत झा, संरक्षण क्षेत्रात बातमीदारी करणारे राहुल सिंग, कॉँग्रेस कव्हर करणारे माजी राजकीय बातमीदार औरंगजेब नक्शबंदी आणि याच समूहाचे वृत्तपत्र ‘मिंट’च्या एका बातमीदाराचा समावेश आहे.

अन्य प्रमुख माध्यम संस्थांमध्ये काम करणाऱ्या कमीत कमी एका तरी बातमीदाराचा फोन नंबर या लिस्टमध्ये दिसून येत आहे. यामध्ये इंडियन एक्सप्रेसच्या ऋतिका चोप्रा (ज्या शिक्षण आणि निवडणूक आयोगायची बातमीदारी करतात) इंडिया टुडेचे संदीप उन्नीथन (जे संरक्षण आणि लष्करासंबंधी बातमीदारी करतात), टीवी १८ चे मनोज गुप्ता (जे शोध पत्रकारीता आणि संरक्षण संबंधांचे संपादक आहेत), द हिंदूच्या विजेता सिंग (ज्या गृह मंत्रालयांची बातमीदारी करतात) यांचा समावेश आहे. यांच्या फोनवर पाळत ठेवण्यात आल्याच्या प्रयत्नांचे पुरावे मिळाले आहेत.

‘पिगॅसस’ काय आहे?

जगभरातील महत्त्वाचे सुमारे १,४०० मोबाईल क्रमांक हॅक करण्यासाठी गुप्तहेरांनी ‘पिगॅसस’ या तंत्रज्ञानाचा वापर केला होता. ‘पिगॅसस’ हे हेरगिरी तंत्रज्ञान इस्रायलच्या एनएसओ या कंपनीने विकसित केले आहे, अशा बातम्या २०१९मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. व्हॉटस अ‍ॅप या समाज माध्यम कंपनीने इस्रायली गुप्तहेर संस्था- ‘एनएसओ’ला न्यायालयात खेचण्याचा इशारा २०१९च्या ऑक्टोबरमध्ये दिला होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
Next Post

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा ६० लाख नागरिकांना धोका : आरोग्यमंत्री राजेश टोपे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात गेल्या २४ तासांत आढळले ६०,७५३ कोरोनाबाधित, १६४७ रुग्णांचा मृत्यू

June 19, 2021

दिव्यांगांची सेवा हाच सर्वात मोठा आशीर्वाद : ना. गुलाबराव पाटील

June 3, 2022

महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील उद्या भरणार उमेदवारी अर्ज

April 23, 2024

जळगावात रिक्षाचालकाचा तरुणावर चाकू हल्ला !

December 16, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group