मुंबई (वृत्तसंस्था) भाजपन नेते किरीट सोमय्यांना किरकोळ जखम झाल्याचा अहवाल भाभा रुग्णालयाने दिला आहे . सोमय्यांना जखम झाल्यावर कसलाही रक्तस्त्राव झाला नाही , असंही या वैद्यकीय अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे . किरीट सोमय्यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर हा अहवाल समोर आला आहे.
किरीट सोमय्यांवर खार पोलिस स्टेशनबाहेर हल्ला झाला होता. त्यात त्यांच्या चेहऱ्यावर दुखापत करण्यात आली होती. ही जखम नसून सोमय्यांनी टोमॅटो सॉस लावल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. दरम्यान, याप्रकरणी भाभा रुग्णालयाने सोमय्यांचा वैद्यकीय अहवाल दिला आहे. त्यात सोमय्यांना जखम झाल्यावर रक्तस्त्राव झाला नसल्याचे, वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे. सोमय्यांची वैद्यकीय तपासणी नंतर हा अहवाल समोर आला आहे. सोमय्यांना गंभीर इजा नसल्याची भाभा रुग्णालयातील डॉक्टरांनी माहिती दिली आहे.
शनिवारी झालेल्या हल्ल्यात सोमय्यांना 0.1 सेमीची जखम असल्याचे आढळून आले. सूज आणि रक्तस्त्राव नसल्याचे देखील वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. सोमय्यांनी शिवसैनिकांनी प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्रात जे उद्धव ठाकरे, शरद पवारांना ओळखतात, त्यांना इतके लोकशाहीवादी सरकार संपूर्ण देशात नाही हे कळेल. विरोधकावंर हल्ले म्हणजे काय? कोणी एखादा माथेफिरु, वेडा स्वत:वर हल्ला झाला म्हणून ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल आणि राष्ट्रपती राजवट लावा सांगत असेल तर अशा मूर्खपणाकडे दुर्लक्ष केले पाहिजे.”, असे संजय राऊत म्हणाले.
पोलिसांनी माझी तक्रार नोंदवून घेतली नाही- सोमय्या
किरीट सोमय्या बोगस FIR प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी काल खार पोलिस स्टेशनमध्ये गेले होते. खार पोलिस स्टेशनमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी पोलिसांवरच गंभीर आरोप केले. सुरूवातीला तक्रार नोंदवून घेऊ, असे सांगत पोलिसांनी आपल्याकडील कागद स्वत:कडे घेतले. त्यानंतर 2 तास निव्वळ बसवून ठेवले. 2 तासाने पोलिस आयुक्तांचा फोन आल्यानंतर त्यांनी ते कागद फाडले व माझी तक्रारही दाखल करून घेतली नाही, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. राणा दाम्पत्याची भेट घेण्यासाठी गेलेल्या किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्याप्रकरणी पोलिसांनी बोगस FIR दाखल केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. याप्रकरणी सोमय्या आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचीही भेट घेणार आहेत.